MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Tuesday, June 2, 2020

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले


   

           महात्मा जोतीराव गोविंदराव फुले 


> १ ९ २७ साली म . फुल्यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र पंढरीनाथ पाटील यांनी लिहिले .


> जन्म - ११ एप्रिल १८२७


> मूळगाव - कटगुन ता . खटाव जि . सातारा .


> खरे आडनाव - गोरे पण फुलांच्या व्यवसायातून फुले .


> १८४० - सावित्रीबाईंशी विवाह ( धनकवडी येथील खंडोजी नेवशे ( झगडे ) पाटील यांची कन्या )


> १८४१-४७ - शिक्षण - स्कॉटिश मिशन हायस्कूल ,


> १ जानेवारी १८४८ - बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली .


> १८४ ९ - अस्पृश्यांना शिक्षणावरून वडिलांशी मतभेद झाल्याने पत्नीसह गृहत्याग .


> ३ जुले १८५१ मुलींची दुसरी शाळा बुधवार पेठेतील गावंडे व वाळवेकरांच्या मदतीने .


> १७ सप्टेंबर १८५१ मुलींसाठी तिसरी शाळा - रास्ता पेठेत .


> १५ मार्च १८५२ - मुलींसाठी चौथी शाळा - वेताळ पेठेत .

> १८५२ - शिक्षणक्षेत्रातील या कामगिरीबद्दल - विश्रामबाग वाड्यात - मेजर कॅडी यांच्या हस्ते सत्कार ( पुणे महाविद्यालयाचे डेक्कन कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य )


> १८५२ पुना लायब्ररीची स्थापना .


> १० सप्टेंबर १८५३ - ' महार - मांग इत्यादि लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ' ही संस्था स्थापन .


> १८५५ - रात्रशाळेची स्थापना .


> १८५६ - सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला . शेंडे व कुंभार या मारेक - यांनी जोतीरावांपुढे शरणागती पत्करली .


> १८६० - शेणवी जातीत पहिला पुनर्विवाह घडविला .


>. १८६३ - ' बालहत्या प्रतिबंध गृह ' सुरू . ' यशवंत ' नावाचा मुलगा दत्तक घेतला .


> १८६५ - न्हाव्यांचा एक दिवसाचा संप घडवून आणला . तुकाराम तात्या पडवळ यांच्या ' जातिभेद विवेकसार ' पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते .


> १८६८ - घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला .


> 24 सप्टेबार 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना .


> २५ डिसेंबर १८७३ - सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह लावला .


> सप्टेंबर १८७५ - पुण्यात दयानंद सरस्वतीच्या मिरवणुकीत सहभाग .


> १८७६ - १८८२ पुणे नगरपालिकेचे सभासद होते .


> १८७७ - धनकवडी येथील दुष्काळपीडितांसाठी कॅम्प . जोतीबांच्या प्रेरणेने ' दीनबंधू ' साप्ताहिक सुरू , संपादक कृष्णराव भालेकर .


> १८८० - मिल हँड असो . ची स्थापना ( मुंबई ) नरे व लोखंडे यांच्या सहकार्याने .


> १८८२ - हंटर आयोगापुढे साक्ष , टिळक व आगरकरांची तुरुंगातून सुटका झाल्यावर मुंबईत सत्कार.


> ११ जून १८८५ - मराठी ग्रंथकार सभेस पत्र लिहून साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यास नकार कळवला .


> १३ जून १८८५ - सत्सार १ चे प्रकाशन .


> २ मार्च १८८८ - ड्युक ऑफ कॅनॉटच्या सत्कार सभेला शेतकऱ्यांच्या वेशात ,


> ११ मे १८८८ मुंबई येथे ' रावसाहेब वडेदार ' यांच्यातर्फे ' महात्मा ' ही पदवी त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले म्हणून तेव्हापासून ते ' महात्मा ' म्हणून ओळखले जाऊ लागले .


> २८ नोव्हेंबर १८ ९ ० - मृत्यू .


> जोतीबा फुलेंवर प्रभाव होता -
     • थॉमस पेनच्या ' द राइटस ऑफ मॅन ' या ग्रंथाचा .
     • अश्वघोषचे - ' वज्रसूची ' उपनिषद - यात जातिभेद खोटा आहे हे तत्त्व .
     • कबीराच्या बीजक ग्रंथातील ' विप्रमति ' या प्रकरणाचा प्रभाव , स्वतःचा उल्लेख एका ठिकाणी - ' कबीर साधूच्या पंथाचा ' असा केला .


> त्यांनी वेद , साहित्य , पुराणे याचाही अभ्यास केला . अनेक संस्कृत ग्रंथही वाचले .


> जातिआधारित हिंदूंची समाजरचना व ब्रिटिशांची शासनव्यवस्था - या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकन्यांची आणि दलितांची दैन्यावस्था , यातून बाहेर पडण्याकरिता एकमात्र उपाय - लोकशिक्षण .


> जोतीबांच्या कार्यातील सहकारी - सदाशिव बल्लाळ गोवंडे , सखाराम यशवंत परांजपे , मोरोपंत विठ्ठल वाळवेकर , डॉ . विश्राम रामजी घोले . तुकाराम तात्या पडवळ , स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारु , व्यंको बाळूजी कालेवार , जाया काराडी लिंगू ना . मे . लोखंडे , कृष्णाजी भालेकर , ताराबाई शिंदे , बाबा पद्मजी .


> महाराष्ट्राचे ' मार्टिन लुथर किंग ' शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे पहिले समाजसुधारक .


> १८४७ -
     • लहुजी बुडा मांग यांच्याकडून नेमबाजी - दांडपट्टा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले .
     • गुरूकन्याचे ९ व्या वर्षी विधवा होऊन मुंडन केलेले तिचे हाल पाहून आघात फुल्यांना आघात बसला .
     • याच वर्षी ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत त्यांचा अपमान झाला होता .


> पुस्तके / ग्रंथसंपदा -
( १ ) नाटक - तृतीय रत्न ( १८५५ ) , ( २ ) छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा ( जून १८६ ९ ) , ( ३ ) ब्राह्मणांचे कसब ( १८६ ९ ) , ( ४ ) अखंडादि काव्यरचना ( १८६ ९ ) , ( ५ ) गुलामगिरी ( १८७३ ) , ( ६ ) शेतकन्यांचा आसूड ( १८ जुलै १८८३ ) , ( ७ ) सत्सार ( द इसेन्स ऑफ टूथ ) अंक -१ ( १३ जून १८८५ ) , ( ८ ) इशारा ( १८८५ ) . ( ९ ) सत्सार अंक -२ ( ऑक्टोबर १८८५ ) , ( १० ) सार्वजनिक सत्यधर्म ( म . फुले यांच्या मरणोत्तर १८ ९ १ मध्ये प्रकाशित .


> हिंदू धर्माच्या चौकटीत सापडलेल्या समाजाची मानसिक गुलामी व शूद्रांचे दैन्य दाखवण्यासाठी - ब्राह्मणांचे कसब , गुलामगिरी , सत्सार हे निबंध लिहिले .
      • यात पुराणातील कथांची ऐतिहासिक दृष्टिकोनातून मीमांसा केली .
      • आर्य - इराणचे होते . भारतदेश जिंकून त्यांनी - शूद्रांना गुलामगिरीत ढकलले .


> ' ब्राह्मणांचे कसब याची अर्पणपत्रिका - " महाराष्ट्र देशातील कुणबी , माळी , मांग , महार यांस हे " पुस्तक ग्रंथकाने परमप्रीतीने नजर केले .


> ' गुलामगिरी ' अर्पण केले - " गुलामांना दास्यात्वातून मुक्त करण्याच्या कामात औदार्य , निरपेक्षता व परोपकार बुद्धी  दाखविणाऱ्या युनायटेड स्टेटस् मधील सदाचारी लोकांना.


> 'शेतक-यांचा  आसूड ' -  शूद्र शेतकऱ्यांच्या बचावाकरिता ' लिहिल्याचे जोतिबांनी म्हटले .
     • बहुजन समाजातील श्रमिकांच्या आर्थिक अवनतीचे चित्रण यात केले तसेच ब्रिटिशांच्या साम्रज्यवादी धोरणापायी भारतीय ग्रामोद्योग व कुटिरोद्योग कसे बंद पडले गेले व ग्रामीण उद्योग व शेती यात आधुनिक तंत्रविज्ञान वापरावे - हा उपायही त्यांनी सुचवला होता .


> इशारा पुस्तिका - ' जोतीबा फुले ' यांनी - न्या रानडे यांच्या ' तीस वर्षांपेक्षा हल्ली शेतकन्यांची स्थिती चांगली आहे . ' . या मताचे खंडण करण्यासाठी होती हे लक्षात येते .


> सार्वजनिक सत्यधर्म ( १८ ९ १ ) - यात ' विश्वकुटुंबवादाची ' सुसंगत मांडणी केली होती तसेच , ' स्वातंत्र्य , समता , बंधुता ' या मूलभूत मानवी मूल्यांच्या आधारावर समाजरचना कशी असावी हे सांगितले होते व अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीची तत्त्वे - भारतीय समाजरचनेच्या संदर्भात मांडली.


> इंग्रजांचे राज्य गेले तर पुन्हा पेशवाई येईल - या विचारातून - १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध फसले याचा त्यांना आनंद झाला .


> विधवांच्या केशवपनाला आळा घालण्यासाठी ' तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप , यात सहभागी नारायण मेघाजी लोखंडे , प्रेरणा - सावित्रीबाई .


> छ . शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात स्वत : ला ' कुळवाडी भूषण ' उपाधी लावली . रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था राखावी असे सरकारला निवेदन दिले होते.


> सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने - पहिला विवाह - २५ डिसें १८७३ सीताराम आल्हाट व राधाबाई निंबकर यांचा .


>शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे - महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक होते .


> खतफोडीचे बंड - पुणे व नगर जिल्ह्यात ज्याला जोतीरावांचा पाठिंबा होता .
     • सावकारशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी झालेले हे शेतकऱ्यांचे बंड होते .
     • जुन्नर तालुक्यात - शेतकऱ्यांचा पहिला असहकार ( कर न देणे ) अडवला .


> जोतीबांचे टिकाकार - विष्णुशास्त्री चिपळूणकर
     • त्यांनी फुल्यांना दिलेल्या पदव्या - ' शूद्रजगद्गुरू व शूद्रधर्मसंस्थापक .


> संस्कृत भाषेतील - ग्रंथ निर्मितीसाठी - सरकारतर्फे मिळणाऱ्या ' दक्षिणा प्राईज ' कमिटीचा पुरस्कार ' मराठी साहित्याला मिळावा यासाठी पुढाकार घेतला .


> जोतीबांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात तीन चळवळी सुरू झाल्या .
     ( १ ) दलितोद्धार चळवळ - सुरुवात- जोतीबांच्या प्रेरणेने - शिवराम कांबळे व गणपतराव फलगावकर .
     ( २ ) कामगार चळवळ - कृष्णराव भालेकर व नारायणराव लोखंडे .
     ( ३ ) ब्राह्मणेत्तर चळवळ - केशवराव जेधे व नारायण जवळकर .


> धार्मिक विचार -
     • थॉमसे पेन प्रमाणे - एकेश्वरवादी .
     • कर्मकांड व रुींवर टीका तरी ते नास्तिक नव्हते . ईश्वराला ' निर्मिक ' म्हणत .
     • सर्वांचा नियंत्रक - निर्मिक.
     • सर्व मानवांचा एकच धर्म असावा , एक धर्म - एक ईश्वर       • मूर्तिपूजा , अवतार कल्पनांना विरोध .
     • ईश्वर उपासनेला मध्यस्थाची गरज नाही .
     • ईश्वरावर विश्वास , सत्याचा शोध आणि नीतीची जोपासना ही तीन तत्त्वे त्यांच्या धर्मविषयक विचारांचा गाभा आहे .
     • ईश्वरनिष्ठ मानवतावाद - धार्मिक विचारांचा पाया.


> सामाजिक विचार -
      • जन्मसिद्ध , नैसर्गिक अधिकाराचे समर्थन
      • वर्णव्यवस्था , जातिभेद , अस्पृश्यता , स्त्रियांवरील अन्याय यावर टीका.
      • स्त्रियांना मानवी हक्कांची जाणीव होऊ नये , या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांना विद्या शिकवण्यास प्रतिबंध केला , असे मत त्यांनी मांडले . '
      • स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे - असेही ते म्हणत.
      • सामाजिक सुधारणा प्रथम झाली पाहिजे हे त्यांचे मत .
      • सामाजिक सुधारणांबाबत सरकारच्या तटस्थ वृत्तीवर जोतीरावांचा आक्षेप होता .


> शिक्षणविषयक -
     • ब्रिटिशांचे शै . धोरण त्यांना मान्य नव्हते . उच्च वर्णियांसाठी पुष्कळ खर्च होतो पण खेड्यातील लोकांच्य शिक्षणासाठी खास प्रयत्न होत नाहीत .
     • १८८२ च्या हंटर आयोगाकडे पाठवलेल्या निवेदनात जोतीबा म्हणतात.
     • खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षणाची सोय करावी .
     • खेड्यात जाण्यास शिक्षक तयार होत नाहीत म्हणून त्यांच्या पगारात वाढ करावी .
     • दलितांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणास प्रोत्साहन म्हणून - शिष्यवृत्ती द्यावी .


> शिक्षण असे असावे की , तरुणांमध्ये स्वत : चा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे .
     • बहुजन समाजातील शिक्षक असावेत .


> महात्मा फुले यांच्या डोळ्यापुढील समाज शोषक व शोषितांच्या रुपात होता .
त्यांनी शेटजी , भटजी व लाटजी यांच्याविरुद्ध शोषित जातींच्या एकजूटीवर भर दिला .
     • वर्ग , जाती हे कृत्रिम भेद नष्ट करून समताधिष्ठित समाज निर्माण करणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते . 

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.