MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Tuesday, June 2, 2020

न्यायमूर्ती म . गो . रानडे

   
             

               न्यायमूर्ती म . गो . रानडे

> महाराष्ट्रातील संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक हिंदी अर्थशास्त्राचे जनक , सनदशीर राजकारणाचे संस्थापक


> 1८ जाने १८४२ जन्म- निफाड ( नाशिक )


> प्रा . शिक्षण - कोल्हापूर येथे तर उच्च शिक्षणासाठी १८५८ ला मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला .


> १८६२ ला इतिहास व पॉलिटिकल इकॉनॉमी या विषयात प्रथम श्रेणीत बी.ए. झाले . तसेच , ' इंदुप्रकाश ' वृत्तपत्रातील इंग्रजी विभागात - समाजसुधारणांविषयी लेखन करत असत .


> १८६५ ला एल.एल.बी. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय ' फेलो ' म्हणून नियुक्त . विधवा विवाहोत्तेजक मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ बनले .


> १८६६ भाषांतरकार म्हणून नियुक्ती . अक्कलकोट संस्थानचे कारभारी ( दिवाण ) म्हणून कोल्हापूर येथे न्यायाधीशपदी कार्यरत .

> 3१ मार्च १८४० - मुंबईत प्रार्थना सभा - सहभागी - रानडे , डॉ. आत्माराम पांडुरंग , स.गो. भांडाकर , वामन अथारी मोडक


> १८६८ - एलफिन्स्टन कॉलेजात - इंग्रजी य इतिहासाचे प्राध्यापक म्हणून


> १८६ ९ - एका विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला .


> १८७१ - पुण्यात बदली सार्वजनिक सभेची सूत्रे ताब्यात घेतली .


> यावर्षी मुंबई सरकारने त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली .


> १८१३ - पहिल्या पत्नीचा मृत्यू वडिलांच्या आहाने - १२ वर्षाध्या कुमारिकेसोबत लग्न . म . गो . रानडेंनी बालविवाहाला विरोध व विधवाविवाहाचा पुरस्कार करूनही स्वतः पालन न केल्याने - त्यांच्यावर समाजातून जोरदार टीका.


> १८८५ - मुंबई इलाख्याच्या विधानमंडळात विधी सदस्य ( Law Member ) म्हणून नियुक्ती . ( मुंबई इलाख्याचे गटईनर )


> १८८७- इंडियन सोशल कॉन्फरन्स ( भारतीय सामाजिक परिषदे ) ची स्थापना न्या . रानडे यांनी केली . त्यामागे प्रयल असे होते की सामाजिक समस्या काँग्रेसच्या अधिवेशनात चर्चिला जाव्यात पण काँग्रेसचे पुढारी त्यास अनुकूल नव्हते . म्हणून ही कॉन्फरन्स १८८७ ला काँग्रेस अधिवेशनानंतर आयोजित करण्यात आली . दोघामध्ये वितंडवाद टाळण्यासाठी त्यांनी जाहीर केले की सोशल कॉन्फरन्स काँग्रेस अधिवेशनाच्या दालनात होणार नाही


> १८८९ - Industrial Association of Westem India ची स्थापना ,


>१८९० औद्योगिक परिषद


> १८९३ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती


> १८९६ - टिळकांनी सार्वजनिक सभा ताब्यात घेतल्यानंतर - रानडेंनी " डेक्कन सभा ' ही संस्था सुरू केली नंतर या संस्थेची जबाबदारी- शिष्य गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावर सोपवली . या गुरू शिष्यांची परंपरा अशी होती . न्या . का . त्रिं . तेलंग - न्या . म . गो . रानडे - ना . गो . कृ . गोखले - म . गांधी मृत्यू - १६ जाने . १ ९ ०१ , मुंबई लेखन - एकेश्वरनिष्ठांची कैफियत , इतिहास , शाखे , थोर पुरुषांची चरित्रे , मराठा सत्तेचा उदय ( Rise of Maratha Powar)


> रानडे यांच्या एम.ए.च्या परीक्षेतील उत्तरांचा आशय इतका सुंदर होता की , त्यांच्या उत्तरपत्रिका सर अलेक्झांडर ग्रांट यांनी - एडिनबरो युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी पाठवल्या .


> रानडे - आस्तिक होते - धार्मिक अध्यात्मवाद व तात्विक उदारमतवाद ही त्यांची वैचारिक बैठक


> परमेश्वराचे अस्तित्व मान्य . त्याच्यामुळेच सृष्टी वे निसर्ग नियम - चालतात . ऑगस्ट कॉम्त याच्या विचारांशी सहमत - " माणसाने आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून केलेले नैतिक कायदे पाणसातील ईश्वरी अंशाचा साक्षात्कार देतात ,


> अवतार सिद्धांतावर विश्वास नाही . दैववाद , नशीब मान्य नाही .


> रानडेंवर प्रभाव असलेले पाश्चात्य विचारवंत : हेगेल , ऑगस्ट , कॉम्स , स्पेंगलर इ .


> भारतीय समाजातील वैचारिक दास्यांवर ते कायम टीका करत
• वेगळे राहणे
• बुद्धीचा वापर न करणे
• वर्णभेद , व्यक्तिभेद
• नशिबावर हवाला ठेऊन जगणे . यावर टीका


> इंडियन सोशल कॉन्फरन्स - वेगवेगळ्या सामाजिक सुधारणांमधून माणसाची नैतिक पातळी उंचावली - तरच राजकीय व आर्थिक सुधारणा घडून येतील - हा विचार रुजवण्यासाठी रानडे या कॉन्फरन्सचा वापर करत ,


 > समाजसुधारण्यासाठी त्यांनी चार पद्धती सांगितल्या होत्या.
(१ ) पारंपारिक पद्धत - मूळ धर्मग्रंथांचा नवा अर्थ काढायचा व सुधारणांचा पाया त्यात असल्याचे समाजाला पटवून द्यायचे.  स्वामी दयानंद व राजा राममोहनराय यांनी ही पद्धत स्वीकारली होती . उदा . मनुस्मृति , पुराणे - हे एक पलित्वाचा पुरस्कार करतात .

( २ ) वैचारिक बदल - माणसाच्या विचारांचा आवाहन करून बदल घडवून आणायचा . साधने - सभा , व्याख्याने , मुलाखती , पत्रव्यवहार , लेख इ . तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून लोकांमध्ये वैचारिक बदल घडवून आणण्यावर भर दिला .

( ३ ) कायद्याने बदल - राज्याने काही कायदे करावे . ज्याद्वारे सामाजिक समाजसुधारणांना हातभार लागेल .
उदा . ( १ ) विवाहाचे वय निश्चित करावे . मुलाचे १६ ते १८. मुलीचे वय १० ते १२
( २ ) विवाहासाठी - स्थानिक संस्थांची परवानगी द्यावी .
( ३ ) पुरुषाचे वय ४५ पेक्षा अधिक असेल त्यांनी : - कुमारिकेशी लग्न करू नये .
( ४ ) जी मुले - शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग करत नाही - त्यांना विद्यापीठाकडून खास बक्षीस द्यावे .
• याबाबत टिळकांचे मत होते - समाजसुधारणांचे नियम परकीय इंग्रजांना करू देऊ नये ,

( ४ ) क्रांतिकारी पद्धत त्यांना मान्य नव्हती . हेगेल , केशवचंद्रसेन प्रमाणे त्यांचे विचार होते इतिहासाच्या विकासामागे परमेश्वराचा हात असतो . दैवी सत्ता ही मानवी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांचे मत होते म्हणून त्यांच्या मते - ब्रिटिशांचे भारतातील आगमन व त्यांचे इथले शासन हा परमेश्वरी नियोजनाचाच एक भाग होता . ' मराठा सत्तेचा उदय ' या त्यांच्या ग्रंथात त्यांनी  भारतीयराष्ट्रवादाची उत्पत्ती कशी झाले याचे विवेचन केले आहे . मराठ्यांच्या उदयामागे - धार्मिक , सामाजिक कारणे होती . दक्षिणेकडील प्रबोधनाचे ते अपत्य होते .
• भारतीय राष्ट्रवादाची सुरुवात शिवाजी राजांच्या कालखंडात झाली .

> भारत - हे एक राष्ट्र म्हणून - उभे करण्यात - ब्रिटिशांचा महत्त्वाचा भाग होता .


> हिंदू - मुस्लिम यांच्या एकत्रित येण्याची गरज आहे .  ज आहे . 


> सामाजिक पिळवणुकीबद्दल ते म्हणतात
 •" अन्यायाचा घातक परिणाम काय होत असेल तर तो हा की जे अतिशय खालच्या पातळीवर- अन्यायाखाली भरडले जातात ते आपली पिळवणूक करणाऱ्यांचेच हात चाटतात . "
• व्यक्तिस्वातंत्र्यवाद व आदर्शवाद यांचे ते मिश्रण होते .
• ब्रिटिशांच्या कायदा व न्यायपद्धतीवर विश्वास होता .
• उदारमतवादी
• समाजातील सर्व व्यक्तींचा विचार एकत्र
• अॅरिस्टॉटलप्रमाणे - समाज व राज्याचे प्रयोजन - व्यक्तीच्या सुख व कल्याणात



आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.