MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Monday, June 8, 2020

बाबासाहेब आंबेडकर


                   बाबासाहेब आंबेडकर


 बाबासाहेबांच्या जीवनाचा कालपट -

> जन्म - १४ एप्रिल १८ ९ १ ( महू . म.प्र . )

> १ ९ १३ - एलिफिन्स्टनमधून बी.ए. ( पर्शियन व इंग्रजी )

> जुलै १ ९ १३ - सयाजीराव गायकवाड - यांच्या मदतीने -       अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश

> १ ९ १५ - कोलंबियातून एम.ए.
  ( मुख्य विषय - अर्थशास्त्रातील प्राचीन भारतातील व्यापार)
   1989  Phd Hit The National Dividend of         India - A Historical & Analytical study

> १ ९ १७ ला Ph.del

> जून १ ९ १६ - इंग्लंडला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स       अॅण्ड पॉलिटिकल सायन्सला प्रवेश घेण्यासाठी

> जुलै १ ९ १७ - बडोदे सयाजीराव महाराज यांचे मिलट्री         रोक्रेटरी म्हणून

> नोव्हें . १ ९१८- मुंबईस सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक         म्हणून साऊथबरो कमिटीसमोर साक्ष ( १ ९ १ ९ ) -             अस्पृश्यांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व         असावे असा विचार सर्वप्रथम मांडला . यावेळी                      कमिटीसमोर अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी            करण्यासाठी वि . रा . शिंदे व डॉ . आंबेडकर यांची                सरकारने निवड केली होती . यावेळी सर्वप्रथम सर्वच            भारतीयांना मतदानाची अधिकार मिळाला पाहिजे ही            मागणी त्यांनी केली होती .

> जाने . १ ९ २० - ' मूकनायक साप्ताहिक'.

> सप्टें . १ ९ २० - पुन्हा लंडनमध्ये .
   • माणगाव ( कोल्हापूर ) - बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली       अस्पृश्यांची परिषद ( शाहू महाराज उपस्थित )

> जून १ ९ २१ - लंडन विद्यापीठाची - एम.एस्सी .
   • Provincial Decentalisation of Imperial           Finance in British India

> १ ९ २२ - जर्मनीतील बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास

> मार्च १ ९ २३ . - लंडन विद्यापीठाची D.Sc. पदवी               मिळवणारे पहिले भारतीय .
    • विषय - The Problem of Rupee - Its origin          & its solutions हाच प्रबंध १ ९ ४७ ला -                      History  of Indian Currency & Banking          म्हणून प्रसिद्ध .

> जून १ ९ २३ - मुंबई येथे हायकोर्टात वकिलीला सुरुवात

> १ ९ २४ - बहिष्कृत हितकारिणी सभा

> १ ९ २६ - मुंबई प्रांत लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे सदस्य

> मार्च १ ९ २७ - महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह .
   १ ९ २३ ला मुंबई कायदेमंडळात सिताराम बोले यांनी           सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा     ठराव मांडला . तो मंजूर होऊन सरकारने ११ सप्टेंबर १ ९     २७ ला आदेश काढला . त्याचा फार उपयोग झाला नाही .       अस्पृश्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी                 बाबासाहेबांनी महाडला अधिवेशन घेतले .

> एप्रिल १ ९ २७ - ' बहिष्कृत भारत ' पाक्षिक

> २५ डिसेंबर १ ९ २७ - ' मनुस्मृति ' दहन . यावेळी महाडला     सत्याग्रह परिषद होती . स्वागताध्यक्ष दिपू गायकवाड
   होते . अनंत चित्रे , सुरमा टिपणीस यांचा सहभाग होता .

> मे १ ९ २८ - इंडियन स्टॅट्युटरी कमिशन
   ( सायमन कमिशन ) समोर साक्ष

> ३ मार्च १ ९ ३० - काळाराम मंदिर , नाशिक सत्याग्रह १ ९     ३४ पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता . यात स्त्रियांनी भाग           घेतला होता . शेवटी बाबासाहेबांच्या आदेशावरून हा             सत्याग्रह मागे घेण्यात आला .

> डिसें . १ ९ ३० - जनता साप्ताहिक

> १ ९३०-३२ - गोलमेज परिषदेसाठी - लंडनला

> सप्टें . १ ९ ३२ - पुणे करार

> १ ९३२-३४ - भारताला - सुधारणेचा १ ला हप्ता                   देण्यासाठी  नेमलेल्या जॉइंट पार्लमेंटरी कमिटीचे सभासद

> सप्टें . १ ९ ३५ - येवला येथे ' हिंदूधर्म ' सोडण्याचा निर्णय     " मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही . "

> १५ ऑगस्ट १ ९ ३६ - ' इंडिपेंडन्ट लेबर पार्टी ' स्थापन .
   ( स्वतंत्र मजूर पक्ष ) . दलितांच्या हक्कांचा लदा राजकीय        पातळीवर लढवण्यासाठी पक्षाची स्थापना . १ ९ ३७ च्या        निवडणुकात पक्षाने १३ जागा जिंकल्या .

> जाने . १ ९ ३७ - मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर        सभासद म्हणून निवड ,

> एप्रिल १ ९ ४२ - All India Scheduled cast               फेडरेशनची स्थापना .

> जुलै १ ९ ४२ - ग.ज. च्या Exevutive कौन्सिलवर -           मजूरमंत्री म्हणून

> जुलै १ ९ ४५ - पीपल्स एज्युकेशन सोसायटी , मुंबई             स्थापन

> १ ९ ४५ ला गरीब व होतकरू अशा २० विद्यार्थ्यांची              पहिली  तुकडी उच्च शिक्षणासाठी इंग्लंड व अमेरिकेला          पाठवली .

> एप्रिल १ ९ ४६ - सिद्धार्थ कॉलेजची स्थापना , मुंबई

> १ ९ ४७ - कायदामंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात नेमणूक

> नोव्हें . १ ९ ४८ - घटना समितीस मसुदा सादर

> जून १ ९ ५० - औरंगाबाद - मिलिंद कॉलेज स्थापन (             पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे )

> १ ९ ५२ - राज्यसभा सदस्य

> मे १ ९ ५३ - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड               इकॉनॉमिक्स , मुंबईत

> डिसें . १ ९ ५४ - रंगून येथील जागतिक बौद्ध परिषदेस         हजर

> मे १ ९५५- भारतीय बौद्ध महासभा स्थापन

> में १ ९ ५ ६ - सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ , मुंबई स्थापन

> १४ ऑक्टो . १ ९ ५६ -नागपूर  - बौद्ध धर्माचा स्वीकार

> ६ डिसें . १ ९ ५६ - दिल्ली- महापरिनिर्वाण

> मूकनायकच्या शीर्षभागी - संत तुकारामांची वचने असत       तर  बहिष्कृत भारतच्या शीर्षभागी - संत ज्ञानेश्वरांची .
   " समाजाच्या खालच्या पातळीवरील लोकांना मानाचे व         प्रतिष्ठेचे जीवन प्राप्त होणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ
   आहे . " आंबेडकरांचा एकूण दृष्टिकोन - ' राष्ट्रवादी व            मानवतावादी ' असा होता . सर्व धर्माच्या अस्तित्वासाठी        निधर्मी राज्य ते तत्वत : मान्य करतात .

डॉ . बाबासाहेबांचे विचार -


   • " देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत       लढले पाहिजे . "
   • " अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे .
   • " भिक्षेने गुलामगिरी मिळते - स्वातंत्र्य नाही . "
   • " लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे की ,                 ज्याद्वारे  रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक व सामाजिक       जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले जातात . "

> बाबासाहेबांच्या मते भारतीय लोकशाहीच्या उणिवा -             जातिव्यवस्था , आर्थिक - सामाजिक न्यायाची
   आवश्यकता ,
   • विभूतीपूजा ,
   • सहिष्णूतेचा अभाव , .
   • जातिव्यवस्था ,
   • आर्थिक - सामाजिक न्यायाची आवश्यकता
   • संघर्षाची तयारी नाही ,   
   • कमी जागरुकता .

> डॉ . बाबासाहेब तीन जणांना गुरू मानत -
   ( १ ) गौतम बुद्ध ,
   ( २ ) म . फुले व
   ( ३ ) संत कबीर

>  डॉ . बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेत              उपस्थित होते .

> मार्क्सचे संपूर्ण राजकीय तत्वज्ञान - त्यांना मान्य नव्हते .       त्यांच्या मते माणूस हा इतिहासाचा निर्माता आहे . "               आर्थिक शक्तिप्रवाह शेवटी माणसाच्या इच्छेने व मनाने           कार्यान्वित होत असतात . "

> धर्म मानवाचा उदात्त वारसा आहे . मानवी जीवन व               समाजरचना सुधारण्यामध्ये धर्म महत्वाची भूमिका बजावू       शकतो - पैगंबर , बुद्ध , नानक , कबीर इ .
   •  संकुषित धार्मिकता त्यांना मान्य नव्हती . त्यांच्यामते              कायद्यापुढे सर्व धर्म समान असावे , स्वतंत्र भारताचे              उद्दिष्ट  निधर्मी राज्य असावे . तसेच समाजातील सर्व            सामाजिक तु  नैतिक सुधारणा सद्सद्विवेकबुद्धीवर              अवलंबून असतात असे ते म्हणत .

> समाजातील सर्व सामाजिक सुधारणा व नैतिक सुधारणा       लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर अवलंबून ,

 ग्रंथक्रम -

    • प्राचीन भारतीय व्यापार - १ ९ १५
    • भारतीय जातिसंस्था , तिची यंत्रणा , उत्पत्ती व विकास -        १ ९ १६
    • भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक                 पृथक्षरणात्मक परिशीलन ( १ ९ १६ )
    • The Evolution of Provincial Finance in          British India - १ ९ २४ ( इव्हॉल्युशन ऑफ                  प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया )
    • Casts in India - १ ९ २४ ( कास्टस इन इंडिया )
    • Annihilation of Cast - १ ९ ३७ ( अॅनहिलेशन          ऑफ कॉस्ट )
    • Thoughts on Pakistan - १ ९ ४० ( थॉटस ऑन         पाकिस्तान )
    • Ranade , Gandhi & Jina - १ ९ ४३ ( रानडे ,             गांधी व जीना )
    • काँग्रेस व गांधी यांनी अस्पृश्य वर्गास कसे वागवले -
      १ ९ ४५
    • Who were the shudras - १ ९ ४६ हा ग्रंथ म .          जोतीबा फुले या आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ शूद्रास            अर्पण केला .
    • The untouchables - १ ९ ४८ ( द अनटचेबल्स )
    • Thoughts on lingvistatic states - 9844            • Bhuddha & his dhamma - १ ९ ५७ - मरणोत्तर         प्रकाशित ( बुद्ध अॅण्ड हिज धम्म )
    • Riddles in Hinduism - १ ९ ५७ ( रिडल्स इन             हिंदूइझम )


डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन -


> डॉ . आंबेडकरांनी - अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी अत्यंत           सखोल अध्ययन केले होते .

> आफ्रिका - अमेरिकेतील निग्रो समाज , रोमन                       साम्राज्यातील  गुलाम समाज किंवा ज्यू समाज असो ,           प्रत्येक समाजव्यवस्थेचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला       होता .

> अस्पृश्यतेचा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास
   केला .
> गुलामगिरी व अस्पृश्यता यांची तुलना करताना डॉ .               बाबासाहेग म्हणतात ,

> " गुलामीची पद्धत ही अस्पृश्यतेच्या तुलनेत चांगली आहे .     कारण गुलामांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास                 करण्याची  संघी होती ; पण अस्पृश्यांना मात्र आपल्या           व्यक्तिमत्वांचा विकास करण्याची संधी सुद्धा नव्हती . "

> गुलामगिरी बंधनकारक नव्हती अस्पृश्यता बंधनकारक           आहे .

> अस्पृश्यता ही मुक्त नसलेली - बंदिस्त समाजव्यवस्था
   आहे .
> गुलामी करण्याची सक्ती नव्हती ( ऐच्छिक प्रकार ) पण         अस्पृश्यता निवडून घेण्याचा प्रकार नव्हता तो जन्मतःच         चिकटलेला होता .

> अस्पृश्यता ही अप्रत्यक्ष गुलामी असून , गुलामीपेक्षाही तो        सर्वात वाईट प्रकार आहे .

> अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे जातिव्यवस्था नष्ट करणे -          जात नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाही ,      असे त्यांचे स्पष्ट मत होते

> अस्पृश्यतेवरील बाबासाहेबांचा सविस्तर ग्रंथ -
   (1) The Untouchables ,
   (2)who are they & why they become                    untouchables ? ( १ ९ ४८)

> आपल्या संशोधनातून ते है स्पष्ट करतात की अस्पृश्य हे         मूळचे वाताहात झालेले लोक ( Broken Man )
   आहेत .

> अस्पृश्य असल्यामुळे त्यांना हद्दपार करून व्यायाबाहर           राहाण्यास भाग पाडले नाही , तर ते सुरुवातीपासूनच             गावाबाहेर राहत होते . कारण ते वाताहत झालल अंक हात     व स्थिर झालेल्या टोळीपेक्षा ते वेगळ्या टोळीतील होते .

> स्टॅनले राइस - यांनी अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा वरभेदावर         आधारित व व्यवसायावर आधारित असे दोन सिद्धांत           मांडले .

> डॉ. बाबासाहेबांनी या सिद्धांताचे खंडन केले - स्वतःचे          काही विचार मांडले .
   ( १ ) बौद्ध धर्माबद्दलचा तिरस्कार हे अस्पृश्यतेचे मूळ
           आहे . जे बौद्धधर्मिय होते . त्यांच्याबद्दल ब्राह्मणांनी               पसरवलेला द्वेष व तिरस्कार हे अस्पृश्यतेच्या                       उगमाच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे .
   ( २ ) गोमांस भक्षण - पूर्वी यज्ञात बळी जाणाऱ्या प्राण्यांचे             मांस पुजारी खायचे . पण बौद्ध धर्मात - पशुबळीचा             तीव्र विरोध , बौद्ध धर्माचा लोकांवर इतका प्रभाव                 पडला की , वाताहात झालेले लोक देखील बौद्ध                   धर्माचे अनुयायी झाले . त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रभाव             कमी करण्यासाठी - ब्राह्मण वर्गान - मांस खाणे                  सोडून ते पूर्ण शाकाहारी झाले . पण वाताहत                      झालेल्या  लोकांनी - गोमांस खाणे सुरू ठेवल्यामुळे              ब्राह्मणांनी त्यांना अस्पृश्य ठरवले .

> समता , स्वातंत्र्य , बंधुत्व या तत्त्वावर आधारित असलेली       न्यायाची कसोटी व सामाजिक उपयुक्ततेची कसोटी या           दोन्ही कसोट्यांवर बौद्ध धर्म खरा उतरतो असे त्यांचे मत       होते .

> आदर्श समाज हा स्वातंत्र्य , समता , बंधुता या                     संकल्पनांवर  आधारित असावा .

> १ ९ २० पासून ते १ ९ ५६ पर्यंत त्यांनी भारतीय समाजात     बदल घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले पण               त्यांच्या  लक्षात आले की , व्यक्तीच्या श्रद्धा - परंपरा             बदलल्याशिवाय कोणतेही परिवर्तन होऊ शकत नाही .           म्हणून त्यांनी बौद्ध धम्माचा मार्ग स्वीकारला .

> चार्तुवर्ण्य व जातिव्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्थेचा         त्याग करून समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण                 करण्याच्या प्रक्रियेचा तो एक महत्त्वाचा पैलू होता .

> बहिष्कृत हितकारिणी सभा ( २० जूलै १ ९ २४ ) मुंबई 
   येथे . 
   • या सभेचे ब्रीदवाक्य होते शिका , संघटित व्हा आणि              संघर्ष करा ,
   • उद्दिष्टे - समाजात जागृती निर्माण करणे , मानवी हक्कांचे        संरक्षण करणे , शिक्षण देणे , आर्थिक स्थिती सुधारणे
      इ .
   • सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ . बाबासाहेब
      होते . तर सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते .

> सायमन कमिशन - बाबासाहेबांनी सायमन कमिशनला दोन     खलित पाठवली .
   ( १ ) अस्पृश्यांच्या हक्कांसंबंधी
   ( २ ) मुंबई प्रांतात कोणते राजकीय हक असावेत
          याबाबत , सायम कमिशनने अस्पृश्यांना राजकीय                हक्क द्यावेत अशी शिफारस केली पण त्यातील                    तरतूर्दीना बाबासाहेबांनी विरोध केला . महारांची                  गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी १ ९ मार्च १ ९ २८            ला मुंबई कायदेमंडळात ' महार वतन बिल ' मांडले .

> १ ९ १८ साली बाबासाहेबांनी ' स्मॉल होल्डिंग इन इंडिया '     हा शोधनिबंध लिहिला होता . त्यात त्यांनी जास्त                 संततीमुळे  होणारे शेतीचे तुकडे व त्यामुळे उभे राहणारे         प्रश्न  यांची चर्चा केली होती .

> १ ९ ३८ ला त्यांनी कुटूंब नियोजनाचा आग्रह धरत               त्यासाठी  कायदा करावा म्हणून विधिमंडळात विधेयक         आणले ,

> २० जूलै १ ९ ४२ ला बाबासाहेब म्हणाले होते की ,               कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या             प्रगतीवरून मोजली जाते . हिंदु कोड बिलाद्वारे सर्व               स्त्रियांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी ते
   लढले ,

> ओबीसीच्या प्रगतीसाठी : १ ९ ३० ला त्यांनी स्टार्ट                कमिटीच्या अहवालात त्यांना आरक्षण व कायदेशीर              संरक्षण देण्याची शिफारस केली .

> मराठवाडा मुक्तिसंग्राम व डॉ . बाबासाहेबांची भूमिका 

   • निझाम राजवटीत पश्त आकाम ही संघटना होती . या            संघटनेतील काही दलित नेते या राजवटीचे समर्थन
      करत ,  हैद्राबादमधील दलित नेते व्यंकटराव व शामसुंदर        हे जहाल भाषेत दलितांना प्रक्षोभित करून                          निझामावरील  निष्ठा व्यक्त  करत , पण संस्थानचे सर्व            दलित ' पश्त अवाम'मध्ये नव्हते . स्टेट काँग्रेस , आर्य            समाज हिंदु महासमा यातही पुष्कळ दलित कार्यकर्ते            होते .
    • डॉ . बाबासाहेबांचा व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा
      ( SCF ) स्वांतत्र्य संग्रामाला पाठिंबा होता . नांदेडला             SCF द पश्त अक्रामच्या कार्यकांत संघर्ष झाल्याची नोंद         आहे .
    • बाबासाहेबांनी संस्थांनातील जनतेला आवाहन केले की ,        त्यांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे . निझाम हा            भारताचा शत्र आहे म्हणून अनुसूचीत जातीतील एकाही        माणसाने निझामाची बाजू घेऊन आपल्या समाजाला            काळिमा फासू नये अशी विनंती त्यांनी केली होती .
     ' निझाम हा शत्रू आहे . त्याची बाजू घेऊ नका ' असे             बाबासाहेबांनी , २७ नोव्हेंबर १ ९ ४७ ला जाहीरपणे             घोषित केले .


> संयुक्त महाराष्ट्राबाबत डॉ . बाबासाहेबांची             भूमिका

    • भाषावार प्रांतरचना केल्यास ऐक्य कमी होऊन भारताचे         अधिक तुकडे पडतील असे बाबासाहेबांना वाटत होते .
    • भाषावार प्रांतरचनेचाच निर्णय झाल्यास संयुक्त                     महाराष्ट्रात उपप्रांत निर्माण न करता एक भाषा एकच             प्रांत करावा असे त्यांचे म्हणणे होते .
    • मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याने                त्याचा  समावेश संयुक्त महाराष्ट्रातच केला जावा असा            त्यांचा आग्रह होता .
    • १ ९ ४८ च्या दारः आयोगाला दिलेल्या निवेदनातही              त्यांनी हीच भूमिका मांडली होती .


     आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.