MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Wednesday, June 17, 2020

दादोबा पांडुरंग तर्खडकर


                दादोबा पांडुरंग तर्खडकर 

                  ( इ . स . १८१४ ते १८८२ )


         " मराठी भाषेचे पाणिनी " म्हणून ओळखले जाणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म मुंबई येथे इ.स .१८१४ मध्ये झाला . त्यांचे घराणे हे मूळचे वसई जवळील तर्खर दादोबा पांडुरंग तर्खडकर .
( इ . स . १८१४ ते १८८२ ) वेथील . त्यांचे आजोबा व्यवसायानिमित्त मुंबईत आले व तेथेच स्थायिक झाले . 

► कार्य 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दादोबा काही काळ जावरा संस्थानच्या नवाबाकडे त्याने खाजगी शिक्षक म्हणून राहिले . नंतर त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकाचं नोकरी मिळाली . पुढे सुरत येथे सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले . 

►  इ . स . १८४४ मध्ये दादोबा पांडुरंगांनी दुर्गाराम मेहता , दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने सुरत येथे ' मानवधर्म सभा ' या संस्थेची स्थापना केली . या सभेच्या सदस्यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती . हिंदू धर्मातील जातिसंस्थेलाही त्यांच विरोध होता . या सभेतील आचार - विचार अतिशय उदार व समता - मानवतावादी होते . या सभेच्या प्रचारासाठी त्यांनी ' धर्मविवेचन ' हा ग्रंथ लिहिला . पुढील काळात या संस्थेच्या वाढीसाठी निष्ठावान कार्यकर्ते लाभले नाहीत . त्यामुळे ती संपुष्टात आली . 

►  इ . स . १८४६ मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टरपदी त्यांची नियुक्ती झाली . 

►  इ . स . १८४८ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातील विद्यार्थ्यांनी दादोबा पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ' ज्ञान प्रसारक सभा ' स्थापन केली . ज्ञान प्रसार करणे आणि सामाजिक जागृती घडवून आणणे ही तिची उद्दिष्टे होती . 

►  इ.स. १८४ ९ मध्ये दादोबा पांडुरंगांनी काही जुन्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने मुंबई येथे ' परमहंस सभा ' स्थापन केली . 
         परमहंस सभेची तत्त्वे मानवधर्म सभेच्या तत्त्वांसारखीच  होती . मूर्तिपूजा करू नये , जातिभेद मानू नये , एकेश्वरवादाचा पुरस्कार करणे , विधवा पुनर्विवाहास संमती असावी यांसारख्या तत्त्वांचा स्वीकार परमहंस सभेने केला होता . 
        सभेमध्ये सर्व जाति - धर्माचे लोक येत असत . अतिशय गुप्त पद्धतीने तिचे कामकाज चालत असे सभेच्या आरंभी आणि अखेरीस ज्या मराठी प्रार्थना म्हणण्यात येत असत त्या दादोबांनी रचल्या होत्या . या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी ' पारमहंसिक ब्राह्यधर्म ' या नावाचा काव्यग्रंथ लिहिला होता , त्यात त्यांनी परमहंस सभेची तत्त्वे विशद केली होती . 

► इ . स . १८५२ मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली . या पदावर असताना त्यांनी इ . स . १८५७ च्या भिल्लांचे बंड मोडून काढण्याच्या कामगिरीबद्दल सरकारकडून त्यांना ' रावबहादुर ' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला . 

►  इ.स. १८६० मध्ये कोणी तरी या सभेच्या सभासदांची यादी चोरून ती प्रसिद्ध केली . सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळे सभासदात प्रचंड खळबळ उडाली . त्यामुळे शेवटी परमहंस सभेच्या प्रमुखांनी ही संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला . 

► ग्रंथसंपदा 

मराठी भाषेचे व्याकरण , मराठी नकाशाचे पुस्तक , विधवाश्रमार्जन , शिशुबोध , यशोदा पांडुरंगी , मराठी लघु व्याकरण , धर्मविवेचन , पारमहांसिक ब्राह्यधर्म इत्यादी .  

► पुरस्कार 

सरकारकडून त्यांना ' रावबहादुर ' हा किताब देऊन गौरविण्यात आले .  


► विशेषता 

' मराठी भाषेचे व्याकरण ' लिहून त्यांनी मराठी व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले ; त्यामुळे ' मराठी भाषेचे पाणिनी ' असा त्यांचा उल्लेख केला 
जातो .

► मृत्यू 

इ . स . १८८२ मध्ये त्यांचे निधन झाले .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                दादोबा पांडूरंग तर्खडकर 

          ( ९ मे १८१४ ते १७ ऑक्टोबर १८८२ )  


►  मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात . मूळ गाव वसईजवळील तर्खड .  

►  शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले . 

►  १८४० ला एल्फिन्स्टन इन्स्टिट्युटमध्ये सुरतला सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त . 

►  १८४४ - सुरत येथे मानवधर्म सभा स्थापन केली . दुर्गाराम मंछराम , दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने . ईश्वर एक आहे , मनुष्यजात एके आहे . धर्म एक आहे परमेश्वरशक्तीसाठी प्रार्थना करावी . सर्वांशी समानतेने वागावे इ . तत्त्वांचा पुरस्कार केला परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ती संख्या फार टिकली 
नाही . 

►  १८४६ - जांभेकरांचा मृत्यूनंतर ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदांवर निवड . 

►  ज्ञानप्रसारक सभेचे संस्थापक अध्यक्ष . ( १८४८ ) 

►  परमहंस सभा स्थापन ( १८४ ९ ) मुंबई येथे , भिकोबा चव्हाण , राम बाळकृष्ण जयकर यांच्या मदतीने केली . जातिभेदाचा निषेध करण्यासाठी अस्पृश्याने केलेले जेवण , ख्रिस्ती माणसाने बनवलेले पाव , मुसलमानाने आणलेले पाणी पिऊन सर्व सदस्यांना भोजन करावे लागे . ' मी जातीभेद मानणार नाही ' अशी शपथ घ्यावी लागे . यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या कार्याला गती मिळाली . १८६० ला परमहंस सभेच्या सभासदांची यादी चोरीस गेल्यामुळे सामाजिक बहिष्काराच्या सभेचे कार्य बंद केले . 

►  १८५२ ला अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती . भिल्लांच्या बंडाचे बिमोड केल्यामुळे रावबहादुर ही पदवी . निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून काम केले . या 

►  ग्रंथसंपदा - मराठी भाषेचे . व्याकरण , मराठी नकाशाचे पुस्तक , विद्येच्या लामाविषयी , विधवा श्रुमार्जन , मराठी लघुव्याकरण , धर्मविवेचन , आत्मचरित्र , शिशूबोध इ .

--------------------------------------------------------------------------------------------------–---------–------------------------



अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.