MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Wednesday, June 17, 2020

जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ

     

              जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ

                  (इ. स. १८०३ ते १८६५)


                जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला .  नानांचे घराणे दैवज्ञ ब्राह्मण ( सोनार ) होते . ठाणे जिल्ह्यातील मुरबाड है त्याचे मूळ गाव होय . त्यांचे आडनाव मुरकुटे असे होते . त्यांचे वडील शंकरशेठ यांनी  व्यापारात भरपूर संपत्ती कमावली होती . त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या अठराव्या वर्षीच घरच्या व्यापारधंद्याची जबाबदार नानांवर येऊन पडली . व्यापारधंद्याचा प्रचंड व्याप असतानासुद्धा त्यांना सार्वजनिक कार्याची अत्यंत आवड होती . नानांचा त्या काळातील अनेक सामाजिक , शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध होता . त्यापैकी बन्याच संस्थाची उभारण त्यांच्याच प्रयत्नाने व पुढाकाराने झाली होती . त्यांच्या या कार्यामुळेच ' आधुनिक मुंबईचे निर्माते किंवा मुंबईचे शिल्पकार ' असे त्यांना ओळखले जाते . 

► कार्य 
० इ.स. १८२३ मध्ये नानांनी बाळशास्त्री जांभेकर , सदाशिवपंत छत्रे इत्यादींच्या सहकार्याने मुंबईत ' बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ' या शिक्षणसंस्थेची स्थापना केली . या संस्थेच्या विद्यमाने त्यांनी मुंबई शहरात व मुंबईबाहेरही अनेक शाळा च कॉलेज उघडले . 

० इ.स. १८२ ९ मध्ये लॉर्ड विल्यम बेटिंग याने सतीची चाल बंद करणारा कायदा केला . या कायद्याला भारतातील सनातनी लोकांनी विरोध केला . या कायद्यामुळे भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला . अशा वेळी नानानों महाराष्ट्रात या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले . 

० इ.स. १८३६ मध्ये सरकारने सोनापूरची स्मशानभूमी शिवडीला हलविण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे जनतेच्या अनेक गैरसोयी होणार होत्या . जनता या निर्णयाविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत होती . जनतेच्या भावना लक्षात घेऊन नानांनी लोकांच्या गैरसोयी गव्हर्नरांना पटवून दिल्या . शेवटी गव्हर्नरांनी तो निर्णय रद्द केला .
० इ. स. १८३७ मध्ये भिवडी येथे अज्ञात इसमांनी विठ्ठलाची मूर्ती फोडली .  त्यामुळे जातीय दंगल झाली , हिंदूंनी मुस्लिमांच्या विरुद्ध कोर्टात फिर्याद दाखल केली . निकाल हिंदूंच्या विरुद्ध लागला , लोक नानांकडे गेले . नानांनी गव्हर्नरांची भेट घेऊन खटल्याची फेरतपासणी करविली . दंगखोरांना कडक शिक्षा होऊन त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला . 

० इ . स . १८४० मध्ये मुंबई विभागातील शिक्षणव्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी सरकारने ' बोर्ड ऑफ एज्युकेशन ' ची स्थापना केली होती . हे बोर्ड अस्तित्वात असेपर्यंत म्हणजे इ . स . १८४० पासून ते १८५६ पर्यंत नाना त्याचे सदस्य राहिले होते . 

० इ . स . १८४५ मध्ये दादाभाई नौरोजी , डॉ . भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत ' स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ' ही संस्था स्थापन केली . नानांनी या संस्थेला सर्वतोपरी मदत केली . भारतीय समाजात विद्येचा व ज्ञानाचा प्रचार व्हावा आणि येथील युवकांत सार्वजनिक कार्याची आवड उत्पन्न व्हावी हा या संस्था स्थापनेचा उद्देश होता .

० मुंबई विभागाचे गव्हर्नर माऊंट एलफिन्स्टन यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांच्या निवृत्तीनंतर स्मारक उभारण्यासाठी नानांनी पुढाकार घेऊन एक फंड जमविला . या फंडातून मुंबईत ' एल्फिन्स्टन कॉलेज ' ची स्थापना त्यांनी केली . तसेच रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरच्या स्मरणार्थ मुंबईत ' ग्रँट मेडिकल कॉलेज ' ची स्थापना करण्यात नानांचा पुढाकार होता . 

० इ . स . १८४६ मध्ये मुंबईच्या म्युनिसिपल कमिशनवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती . 

० इ . स . १८४८ मध्ये त्यांनी मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा सुरू केली . यावरून ते स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते हे समजते . 

० इ.स. १८५२ मध्ये जगन्नाथ शंकरशेठ व दादाभाई नौरोजी यांनी ' बॉम्बे असोसिएशन ' या संस्थेची स्थापना केली , " बॉम्बे असोसिएशन ' ही आधुनिक काळातील भारतातील राजकीय स्वरूपाची पहिलीच संस्था होय , असे म्हणता येईल . 

० इ . स . १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यावर या विद्यापीठाचे फेलो म्हणून नानांची नियुक्ती करण्यात आली . 

► पुरस्कार
० इ. स . १८३५ मध्ये नानांना ' जस्टिस ऑफ द पीस ' चा बहुमान प्राप्त झाला होता . 

► विशेषता 
० आधुनिक मुंबईचे निमति .

► मुंबईचे शिल्पकार
० मुंबईचा अनभिषिक्त सम्राट - आचार्य अत्रे .

► मृत्यू
० ३१ जुलै १८६५ रोजी त्यांचे निधन झाले .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 नाना शंकरशेठ ( १८०३-१८६५ ) - मुंबईचे शिल्पकार 


० जन्म - १० फेब्रुवारी १८०३ , मुरबाड ( जि . ठाणे ) 
येथे , 

० ब्रिटिशांकडून ' जस्टीस ऑफ पीस ' बहुमान , जे.जे. स्कूल ऑफ आर्ट सुरू करण्यात सहभाग . मराठी माध्यम , स्त्री शिक्षण , सतीबंदी व शुद्धीकरणाचा पुरस्कार केला चिंचपोकळी गॅस कंपनी सुरू केली . ते मुंबई कौन्सिलचे पहिले सभासद होते ( १८६२ ) . 

० एलफिन्फ्टनच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सुरू केली . ( १८२२ ) . या सोसायटीने मुंबई व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या . 

० स्टुडंस लिटररी अँण्ड सायंटिफिक सोसायटी ( १८४५ ) ला स्थापन केली यासाठी दादाभाई नौरोजी , भाऊ दाजी लाड यांची मदत झाली . स्वतःच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली . 

० एलफिन्स्टन कॉलेज काढले . 

० ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू केले . ( रॉबर्ट ग्रँट या गर्व्हनरच्या स्मृती प्रित्यर्थ ) 

० बाँम्बे असोसिएशन ( १८५२ ) , शंकरशेठ व दादाभाई नौरोजी - जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनात आणण्यासठी, 

० मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत ( १८५७ ) महत्वाचा सहभाग व पहिले फेलो . 

० ' नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट 
होते ' - आचार्य अत्रे .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.