MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Tuesday, June 16, 2020

विनोबा भावे


                           विनोबा भावे 


► जन्म सप्टेंबर १८ ९ ५ ( गागोदे येथे ) .

► वडील बडोदा येथे गेले नोकरीसाठी गेल्यामुळे पुढील शिक्षण तेथेच घेतले .

► शालेय जीवनातच आजन्म ब्रह्मचारी प्रतिज्ञा घेऊन ती शेवटपर्यंत टिकवली . गांधींसोबत साबरमती आश्रमात 
राहिले . 

► सत्याग्रह आश्रमाची शाखा वाला काढली ( ८ एप्रिल १ ९ २१ ) यासाठी जमनालाल बजाज यांनी आग्रह केला होता . 

► ' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक काढले 
( १ ९ २३ ला ) त्यातून लेखमाला लिहिल्या . उपनिषदांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले . १ ९ २४ ला या मासिकाचे साप्ताहिक वृत्तपत्र केले . या वृत्तपत्रासाठी गोपाळराव काळे , वाळूजकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले . अखेर १ ९ २७ ला हे वृत्तपत्र बंद पडले . 

► नागपूर येथे झेंडा सत्याग्रह ( जून १ ९ २३ ) - विनोबा भावेंसोबत जमनालाल बजाज , विरुळकर , म . भगावनदीन यांनी  सहभाग घेतला होता . यावेळी त्यांना तुरुंगात जावे लागले . हा सत्याग्रह सप्टेंबर १ ९ २३ ला मागे घेतला . 

► वर्धा येथे राष्ट्रीय शाळा काढली . जून १ ९ २८ ला कन्याशाळा काढली नंतर कन्या प्रम काढले . 

► १ ९ ३० च्या सत्याग्रहात वर्धा आश्रमाने चरखा विणण्याच्या तकली गावागावात पोहचवून सक्रीय चळवळ चालवली . 

► शिंदी वृक्ष तोड मोहीम वर्धा जिल्ह्यात शिंदीची खूप झाडे होत
• या झाडापासून चटया , केरसूणी करत पण त्याचा दुसरा दुरूपयोग म्हणजे दारू तयार करण्यासाठी वापर करत . 
• त्यामुळे गोपाळराव वालुंजकर व विनोबा भावे यांच्या प्रयत्नाने ही शिंदी वृक्ष तोड मोहीम हाती घेतली . • मालगुजारांच्या संमतीने त्यांच्याच मालकीची झाडे तोडण्याचा उपक्रम घेतला . 
• सरकारने उपयोगी झाले तोडण्याच्या गुन्ह्यात मालगुजारांवर खटले भरले , दंड केला . 

► मीठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी जंगल सत्याग्रह केला - 
• रानात गुरे चारण्याचा हक्क नव्हता त्यामुळे गवत कापून आणून हा सत्याग्रह करत असत , यावेळी जंगलातील झाडांना हात लावत नसत . 

► विनोबा , धुळे येथे वि . का . राजवाडे स्मारकाच्या उद्घाटनासाठी गेले असता , त्यांनी सार्वजनिक सभांमध्ये केलेल्या भाषणात सरकारला आक्षेपहार्य मजकूर वाटल्याने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली . 
• त्यावेळी धुळे येथील तुरुंगात त्यांना साने गुरुजी , आपटे गुरुजी जमनालाल बजाज यांचा सहवास 
लाभला . 
• जुलै १ ९ ३२ ला त्यांची सुटका झाली . 

► गिताई - १ ९३०-३१ ला गीताई लिहिली . 

► १ ९ ३० च्या चळवळीत वाचा आश्रम जप्त झाला तो परत मिळाला पण विनोबांना तेथे रहावे वाटेना त्यामुळे ते सुरुवातीला नालावडी येथे राहिले नंतर वर्धा - नागपूर रोडवर पवनार येथे आश्रमात रहायला लागले . 

► १ ९ ४० च्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या आंदोलनातील पहिले सत्याग्रही . त्यावेळीही विनोबांना अटक झाली होती . 

► मार्च १ ९ ४८ ला सेवाग्राम येथे रचनात्मक कार्यकर्त्यांचे संमेलन झाले . नेहरा , आझाद , कृपालानी व शंकरदेव हे या ठिकाणी आले असतांना विनोबांच्या प्रेरणेने सर्वोदय समाजाची स्थापना झाली . 

► भारत - पाक फाळणीनंतर दिल्लीला मोठ्या प्रमाणात आलेल्या शरणार्थीच्या सेवेसाठी विनोबा दिल्लीला गेले . 

► नंतरचा प्रवास अजमेर , राऊ ( म . प्र . ) येथे सर्वोदय संमेलन , हैद्राबाद , गुजरात ( बडोदा ) , केरळ , दिल्ली या काळातील भाषणे शांतियात्रा या नावाने प्रसिद्ध . 

► शिवरामपल्ली सर्वोदय संमेलन -
 १ ते ११ एप्रिल १ ९ ५१ . 

► एप्रिल १ ९ ५४ ला बोधगया येथे ६ वे सर्वोदय 
संमेलन . यावेळी जयप्रकाश नारायण यांनी यात सहभाग घेतला

► कर्नाटकातील येलवात येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यासोबत ग्रामदान परिषदेचे आयोजन केले होते . या ठिकाणी बोलतांना विनोबांनी ग्रामदानाला ' संरक्षणाचे साधन ' ( डिफेन्स मेजर ) असे म्हटले . 

► १ ९ ५७ ला त्यांनी ' जय जगत'चा नारा दिला . 

► ऑगस्ट १ ९ ६५ पासून बिहारमध्ये ' तुफान यात्रा ' -६ महिन्यात १० हजार ग्रामदाने करण्यासाठी . 

► विनोबांचे सहा आश्रम ,
• समन्वय आश्रम , बोधगया - १८ एप्रिल १ ९ ५४ - निरनिराळ्या तत्वज्ञानांचा अभ्यास - त्यांच्या समन्वयातून प्रत्यक्ष जीवनाचा प्रयोग .
• ब्रह्मविद्या मंदिर , पवनार - मार्च १ ९ ५ ९ - स्त्रियांच्या सामूहिक साधनेचे स्थान असावे या विचारातून १ ९ ७० नंतर १२ पर्यंत स्वत : विनोबा येथेच राहिले . 
• प्रस्थान आश्रम , पठाणकोठ - येथून पाकिस्तान , काश्मीर , पंजाब - तिन्ही ठिकाणी प्रस्थान करता येईल . 
यातून - ऑक्टो . १ ९ ५ ९ ला स्थापन . 
• विसर्जन आश्रम , इंदौर - १५ ऑगस्ट १ ९ ६० कालबाह्य जुन्या मूल्यांचे विसर्जन व्हावे या उद्देशाने . 
• मैत्री आश्रम - आसाम - मार्च १ ९ ६२ आसाममधील सर्वोदयाचा पाया मजबूत करणे . 
• वल्लभ निकेतन - बेंगलूर - १ ९ ६५ वल्लभस्वामींच्या स्मरणार्थ .

► ब्रह्मविद्या मंदिर , पवनार येथे १ ९ ७ ९ ला विश्व - महिला संमेलन .
• १ ९ ६८ कहलगाव आचार्य कुलाची स्थापना .
• १ ९ ७६ गोहत्याबंदीसाठी - उपवास .
• जाने . १ ९ ८२ देवनार कत्तलखान्यावर सत्याग्रह .
• १६ नोव्हें . १ ९ ८२ मृत्यू . 

► विनोबांचे काही विचार 
• प्रत्येक समस्या अहिंसेने सुटू शकते , पण त्यासाठी हदयशुद्धीची आवश्यकता आहे . 
• भारतात ' Peace Potential ' उद्योगांची गरज 
आहे . 
• राजकारण व धर्मांधता यांच्या मिलनातून सर्वनाश होतो , तर विज्ञान व अध्यात्माच्या मिलनातून सर्वोदय होते . 
A ( अफगाणिस्तान ) , B ( ब्रम्हदेश ) व 
C ( सिलोना श्रीलंका ) हा त्रिकोण आहे ( ABC ) या त्रिकोणाच्या आत देशाचे एक नैसर्गिक संघराज्या व्हावे अशी कल्पना त्यांनी मांडली . 
• भारतात Peace Potential उद्योगांची गरज आहे असे त्यांचे मत होते . 
• जकातमुक्तीमुळे कंपनीची मोठी हानी होत होती . एकंदरीत हा वादाचा विषय बनला . 



अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.