Pages

Monday, June 8, 2020

विनायक सावरकर

                 

                     विनायक सावरकर

> सावरकरांचा जन्म - २८ मे १८८३ ला भगूर
   ( जि . नाशिक)  येथे.

> पुण्याच्या फर्ग्युसनमधून बी . ए . तर मुंबईला एल . एल .       बी. चे शिक्षण घेतले .

> शालेय शिक्षण घेताना दामोदर चाफेकरांना झालेल्या             फाशीच्या शिक्षेचा प्रभाव त्यांच्यावर पडला . त्याचप्रमाणे       मॅझिनी या इटालियन देशभक्ताचाही त्याच्यावर प्रभाव
   होता .

> मित्रमेळा या संघटनेची स्थापना त्यांनी १ जानेवारी १ ९ ००     ला केली ( नाशिक येथे ) गणपती उत्सव साजरा                   करण्यासाठी स्थापन केली होती .

> अभिनव भारत ( १ ९ ०४ ) - मित्रमेळाचे नामकरण               अभिनव भारत केले . या संघटनेवेळी वडील बंधु बाबाराव     सावरकर यांची मदत झाली . ही क्रांतिकारी संघटना होती .

> अभिनव भारताची उद्दिष्टे -
   ( १ ) परदेशात शस्त्र खरेदी करून ती गुप्तपणे भारतात                पाठवणे ,
   ( २ ) भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे ,
   ( ३ ) स्वदेशी , बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या                               कार्यक्रमाद्वारे  लोकमत तयार करणे .
   ( ४ ) शक्य तेथे गनिमी काय्याने लढा देणे .
   ( ५ ) उठावासाठी योग्य संधी शोधणे , सावरकर इंग्लंडला               गेले असताना त्यांचे बंधू गणेश ऊर्फ                                   बाबाराव सावरकर अभिनव भारतचे काम बघत .                 विविध शाखांना भेटी देऊन त्यांनी संघटनेत सुसूत्रता             आणली .
           • सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई                 या लष्करी सेवानिवृत्त व्यक्तीची निवड करण्यात                   आली , यासाठी बाबारावांनी शस्त्रास्त्रे जमवण्याचा               प्रयत्न केला . कलकत्त्याच्या त्र्यंबक चक्रवर्ती या                   व्यापाऱ्याकडून बंदूका , रायफली , दारूगोळा इ .                 साहित्य मिळविले . कोठूरे येथील बर्वेचा वाडा                     अभिनव भारतचे शस्त्रागार होते .

> अभिनव भारतमधील एका फितूरमुळे बाबारावांना अटक       झाली . घराच्या झडतीत आक्षेपार्दा कागदपत्र मिळाली ,         त्यांची संपत्ती जप्त केली . १ ९ ० ९ ला काळ्या पाण्याची       शिक्षा ठोठावण्यात आली .

> यामुळे संतप्त अनंत कान्हेरेने २१ डिसेंबर १ ९ ० ९ ला         कलेक्टर जॅक्सन याचा गोळ्या झाडून खून केला . यावेळी       जॅक्सन नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये किर्लोस्कर           नाटकमंडळीच्या देवल नाट्य कंपनीमार्फत ' शारदा '             नाटकाचा खास आयोजित कार्यक्रम पाहण्यासाठी आला       होता.

> कान्हेरेला फाशी देण्यात आली , गणू वैद्य या                       क्रांतिकारकास  पकडले . त्याने पोलिसांना दिलेल्या             माहितीनुसार अनेकांना अटक करण्यात आली .

> अभिनव भारताच्या पेण शाखेवर व कोठूरच्या बर्वे                 वाड्यावर धाड पडली तेथे शस्त्र सापडली . महाडच्या           शाखेत दिक्षित व पानवलकरांना पकडले . पुणे शाखेचे         सूत्रधार ब्रह्मगिरी बुवांना पकडले . नाशिक , कोल्हापूर ,         औंध , पंढरपूर येथील क्रांतिकारकांना पकडून शिक्षा             दिल्या .

> १ ९ ०६ ला बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले .           यावेळी त्यांनी शामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती                 मिळवली  होती .
   • तेथे गेल्यावर शामजी वर्माच्या ' इंडिया हाऊस'मध्ये               गुप्तपणे बाँम्ब बनवण्याचे कामही चालू गेले व काही             पिस्तुले विकत घेऊन भारतात गुप्तपणे पाठवणे सुरू
     केले .

> जानेवारी १ ९ १० ला - पॅरिसला गेले . ब्रिटिशांनी                 राजद्रोहाच्या आरोपाने त्यांना ' फरारी ' घोषित केले व           पकड वॉरंट निघाले . पॅरिसमधून लंडनला आले तेथे             व्हिक्टोरिया स्टेशनवर त्यांना पकडले .

> यावेळी भारतात आणण्यासाठी त्यांची मोरिया बोटीवरून       रवानगी करण्यात आली यावेळी मोर्सेलिस बंदरात
   ( फ्रान्स ) उडी घेऊन त्यांनी निसटून जाण्याचा प्रयत्न
   केला . ( ८ जुलै १ ९ १० ) पण फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना       पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले .

> सावकरांना नाशिक येथे आणून त्यांच्यावर खटला भरला .     २५ वर्षे जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात       आली . सर्व संपत्ती जप्त करण्यात आली .

> जॅक्सनच्या खूनाला मदत केली म्हणून ३० जानेवारी १ ९       ११ ला सावकरांना दुसऱ्यांदा २५ वर्षांची जन्मठेप
   ठोठावली . अंदमानला पाठवले .

> विठ्ठलभाई पटेल व रंगास्वामी अय्यंगार यांच्या मदतीने           सावरकरांना अंदमानातून भारतात आणले व रत्नागिरीच्या     तुरुगांत ठेवले .

> ६ जानेवारी १ ९ २४ - राजकीय चळवळीत भाग न               घेण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली . पण           रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडू नये असे बंधन               त्यांच्यावर घातले .

> रत्नागिरीत असतांना त्यांचा हिंदु महासभेशी संबंध आला .     तेथेच त्यांनी अस्पृश्यता निवारण , सहभोजन , शुद्धीकरण     मोहिम इ . कार्याकडे लक्ष दिले . रत्नागिरीला पतितपावन       मंदिराची उभारणी केली .

> १ ९ ३७ ला बिनशर्त मुक्तता झाली ( तुरुंगातून ) - १ ९ ३७     ला प्रांतिक सरकारात काँग्रेस अधिकारावर आल्यामुळे           कुपर - जमनादास मंत्रिमंडळाने त्यांच्यावरील बंदी उठवली .

> १ ९ ३७ लाच हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली .

> १ ९ ३ ९ हैद्राबादच्या निजामाविरुद्ध सविनय प्रतिकाराची       मोहीम सुरु केली .

> हिंदुत्वाची व्याख्या करणारे त्यांचे ' हिंदुत्व ' हे पुस्तक १ ९     २३ ला नागपूरहून प्रसिद्ध झाले .

> साहित्यसंपदा - माझी जन्मठेप , १८५७ चे स्वातंत्र्यसमर व     मॅझिनीच्या चरित्राचे भाषांतर ( इंग्लंडला असताना केले . )     संन्यस्त खड्ग ( नाटक ) , सहा सोनेरी पाने ,                       हिंदुपदपादशाही , हिंदुत्व , कोळे पाणी व कमला
   ( काव्यसंग्रह ) .

> मृत्यू- २६ फेब्रुवारी १ ९ ६६ .

> हिंदुपदपादशाही या पुस्तकात मराठ्यांना इंग्रजांनी का            हरवले याचे समीक्षण करतांना सावरकर स्पष्टपणे                लिहितात कि , " हिंदु हे सोळा आणे देशभक्तीत आणि          सार्वजनिक हितकारक सदगुणात इंग्रजांच्या मानाने              पुष्कळच कमी पडले . "

> १८५७ चा उठावं हा ब्रिटिशांबरोबर भारतीयांची झालेली         स्वातंत्र्याची पहिली लढाई होती हे ते निःसंदिग्धपणे               सांगतात , त्यांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाला             व्हॅलेंटाइन चिरोल यांनी ' ज्वालाग्रही वाङ्मय ' असे विशेषण     दिले .

> सावकारांच्या मतानुसार अहिंसा हा सद्गुण असला तरी           संपूर्ण अहिंसा नुसती अयोग्यच नव्हे तर अनैतिकसुद्धा
   आहे . ते म्हणतात - " आम्ही संपूर्ण अहिंसेच्या तत्त्वज्ञानास     झिडकारतो कारण आमच्यात संतप्रवृत्तीचा अभाव               असल्यामुळे नव्हे तर आम्ही जास्त वास्तववादी आहोत         म्हणून . "

> संपूर्ण जग चांगल्या वृत्तीच्या माणसांचे असते तर हिंसेची       गरज असली नसती पण अपरिपूर्ण व दुर्जनांनी भरलेल्या       जगात योग्य गोष्टींसाठी हिंसा ही समर्थनीय मानली
   पाहिजे . भूमिका संन्यस्त खड्ग या मराठी नाटकात .

> अन्याय दूर करण्यासाठी हाती शस्त्र घेण्याचे समर्थन             करतांना ते म्हणतात - " म्हणून ब्रूटसची तलवार पवित्र
   आहे . म्हणून शिवाजीची वाघनखेही पवित्र आहेत . म्हणून     इटलीतील क्रांतीमध्ये झालेल्या रक्तपातांनी ती घटना             सत्कीर्तित दाखल केली गेली आहे . म्हणून पहिल्या               चार्ल्सचा वध हे न्याय्य कृत्य आहे . म्हणून विल्यम टेलचा        बाण हा पवित्र आहे . "

> हिंदु सामर्थ्यवान सैनिक निघावेत यासाठी सावरकरांनी           हिंदुच्या लष्करीकरणावर भर दिला .

> त्यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत राष्ट्र , वंश व संस्कृती या          बाबींवर त्यांनी भर दिला . त्यांचे हिंदुत्वं केवळ धार्मिक         नव्हते तर सामाजिक , राजकीय , नैतिक , आर्थिक व           सांस्कृतिक घटकांचाही त्यात समावेश होता .

> स्वातंत्र्य अखंड हिंदुस्थानच्या स्वरुपात मिळायला हवे असे     त्यांना वाटायचे .

> हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदूस्थानी म्हणावे असे                 सावरकरांनी सुचवले .


  आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1 comment:

Please do not enter and spam link in the comment box.