Pages

Monday, June 8, 2020

बाबासाहेब आंबेडकर


                   बाबासाहेब आंबेडकर


 बाबासाहेबांच्या जीवनाचा कालपट -

> जन्म - १४ एप्रिल १८ ९ १ ( महू . म.प्र . )

> १ ९ १३ - एलिफिन्स्टनमधून बी.ए. ( पर्शियन व इंग्रजी )

> जुलै १ ९ १३ - सयाजीराव गायकवाड - यांच्या मदतीने -       अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश

> १ ९ १५ - कोलंबियातून एम.ए.
  ( मुख्य विषय - अर्थशास्त्रातील प्राचीन भारतातील व्यापार)
   1989  Phd Hit The National Dividend of         India - A Historical & Analytical study

> १ ९ १७ ला Ph.del

> जून १ ९ १६ - इंग्लंडला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स       अॅण्ड पॉलिटिकल सायन्सला प्रवेश घेण्यासाठी

> जुलै १ ९ १७ - बडोदे सयाजीराव महाराज यांचे मिलट्री         रोक्रेटरी म्हणून

> नोव्हें . १ ९१८- मुंबईस सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक         म्हणून साऊथबरो कमिटीसमोर साक्ष ( १ ९ १ ९ ) -             अस्पृश्यांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व         असावे असा विचार सर्वप्रथम मांडला . यावेळी                      कमिटीसमोर अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी            करण्यासाठी वि . रा . शिंदे व डॉ . आंबेडकर यांची                सरकारने निवड केली होती . यावेळी सर्वप्रथम सर्वच            भारतीयांना मतदानाची अधिकार मिळाला पाहिजे ही            मागणी त्यांनी केली होती .

> जाने . १ ९ २० - ' मूकनायक साप्ताहिक'.

> सप्टें . १ ९ २० - पुन्हा लंडनमध्ये .
   • माणगाव ( कोल्हापूर ) - बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली       अस्पृश्यांची परिषद ( शाहू महाराज उपस्थित )

> जून १ ९ २१ - लंडन विद्यापीठाची - एम.एस्सी .
   • Provincial Decentalisation of Imperial           Finance in British India

> १ ९ २२ - जर्मनीतील बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास

> मार्च १ ९ २३ . - लंडन विद्यापीठाची D.Sc. पदवी               मिळवणारे पहिले भारतीय .
    • विषय - The Problem of Rupee - Its origin          & its solutions हाच प्रबंध १ ९ ४७ ला -                      History  of Indian Currency & Banking          म्हणून प्रसिद्ध .

> जून १ ९ २३ - मुंबई येथे हायकोर्टात वकिलीला सुरुवात

> १ ९ २४ - बहिष्कृत हितकारिणी सभा

> १ ९ २६ - मुंबई प्रांत लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे सदस्य

> मार्च १ ९ २७ - महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह .
   १ ९ २३ ला मुंबई कायदेमंडळात सिताराम बोले यांनी           सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा     ठराव मांडला . तो मंजूर होऊन सरकारने ११ सप्टेंबर १ ९     २७ ला आदेश काढला . त्याचा फार उपयोग झाला नाही .       अस्पृश्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी                 बाबासाहेबांनी महाडला अधिवेशन घेतले .

> एप्रिल १ ९ २७ - ' बहिष्कृत भारत ' पाक्षिक

> २५ डिसेंबर १ ९ २७ - ' मनुस्मृति ' दहन . यावेळी महाडला     सत्याग्रह परिषद होती . स्वागताध्यक्ष दिपू गायकवाड
   होते . अनंत चित्रे , सुरमा टिपणीस यांचा सहभाग होता .

> मे १ ९ २८ - इंडियन स्टॅट्युटरी कमिशन
   ( सायमन कमिशन ) समोर साक्ष

> ३ मार्च १ ९ ३० - काळाराम मंदिर , नाशिक सत्याग्रह १ ९     ३४ पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता . यात स्त्रियांनी भाग           घेतला होता . शेवटी बाबासाहेबांच्या आदेशावरून हा             सत्याग्रह मागे घेण्यात आला .

> डिसें . १ ९ ३० - जनता साप्ताहिक

> १ ९३०-३२ - गोलमेज परिषदेसाठी - लंडनला

> सप्टें . १ ९ ३२ - पुणे करार

> १ ९३२-३४ - भारताला - सुधारणेचा १ ला हप्ता                   देण्यासाठी  नेमलेल्या जॉइंट पार्लमेंटरी कमिटीचे सभासद

> सप्टें . १ ९ ३५ - येवला येथे ' हिंदूधर्म ' सोडण्याचा निर्णय     " मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही . "

> १५ ऑगस्ट १ ९ ३६ - ' इंडिपेंडन्ट लेबर पार्टी ' स्थापन .
   ( स्वतंत्र मजूर पक्ष ) . दलितांच्या हक्कांचा लदा राजकीय        पातळीवर लढवण्यासाठी पक्षाची स्थापना . १ ९ ३७ च्या        निवडणुकात पक्षाने १३ जागा जिंकल्या .

> जाने . १ ९ ३७ - मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर        सभासद म्हणून निवड ,

> एप्रिल १ ९ ४२ - All India Scheduled cast               फेडरेशनची स्थापना .

> जुलै १ ९ ४२ - ग.ज. च्या Exevutive कौन्सिलवर -           मजूरमंत्री म्हणून

> जुलै १ ९ ४५ - पीपल्स एज्युकेशन सोसायटी , मुंबई             स्थापन

> १ ९ ४५ ला गरीब व होतकरू अशा २० विद्यार्थ्यांची              पहिली  तुकडी उच्च शिक्षणासाठी इंग्लंड व अमेरिकेला          पाठवली .

> एप्रिल १ ९ ४६ - सिद्धार्थ कॉलेजची स्थापना , मुंबई

> १ ९ ४७ - कायदामंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात नेमणूक

> नोव्हें . १ ९ ४८ - घटना समितीस मसुदा सादर

> जून १ ९ ५० - औरंगाबाद - मिलिंद कॉलेज स्थापन (             पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे )

> १ ९ ५२ - राज्यसभा सदस्य

> मे १ ९ ५३ - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड               इकॉनॉमिक्स , मुंबईत

> डिसें . १ ९ ५४ - रंगून येथील जागतिक बौद्ध परिषदेस         हजर

> मे १ ९५५- भारतीय बौद्ध महासभा स्थापन

> में १ ९ ५ ६ - सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ , मुंबई स्थापन

> १४ ऑक्टो . १ ९ ५६ -नागपूर  - बौद्ध धर्माचा स्वीकार

> ६ डिसें . १ ९ ५६ - दिल्ली- महापरिनिर्वाण

> मूकनायकच्या शीर्षभागी - संत तुकारामांची वचने असत       तर  बहिष्कृत भारतच्या शीर्षभागी - संत ज्ञानेश्वरांची .
   " समाजाच्या खालच्या पातळीवरील लोकांना मानाचे व         प्रतिष्ठेचे जीवन प्राप्त होणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ
   आहे . " आंबेडकरांचा एकूण दृष्टिकोन - ' राष्ट्रवादी व            मानवतावादी ' असा होता . सर्व धर्माच्या अस्तित्वासाठी        निधर्मी राज्य ते तत्वत : मान्य करतात .

डॉ . बाबासाहेबांचे विचार -


   • " देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत       लढले पाहिजे . "
   • " अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे .
   • " भिक्षेने गुलामगिरी मिळते - स्वातंत्र्य नाही . "
   • " लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे की ,                 ज्याद्वारे  रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक व सामाजिक       जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले जातात . "

> बाबासाहेबांच्या मते भारतीय लोकशाहीच्या उणिवा -             जातिव्यवस्था , आर्थिक - सामाजिक न्यायाची
   आवश्यकता ,
   • विभूतीपूजा ,
   • सहिष्णूतेचा अभाव , .
   • जातिव्यवस्था ,
   • आर्थिक - सामाजिक न्यायाची आवश्यकता
   • संघर्षाची तयारी नाही ,   
   • कमी जागरुकता .

> डॉ . बाबासाहेब तीन जणांना गुरू मानत -
   ( १ ) गौतम बुद्ध ,
   ( २ ) म . फुले व
   ( ३ ) संत कबीर

>  डॉ . बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेत              उपस्थित होते .

> मार्क्सचे संपूर्ण राजकीय तत्वज्ञान - त्यांना मान्य नव्हते .       त्यांच्या मते माणूस हा इतिहासाचा निर्माता आहे . "               आर्थिक शक्तिप्रवाह शेवटी माणसाच्या इच्छेने व मनाने           कार्यान्वित होत असतात . "

> धर्म मानवाचा उदात्त वारसा आहे . मानवी जीवन व               समाजरचना सुधारण्यामध्ये धर्म महत्वाची भूमिका बजावू       शकतो - पैगंबर , बुद्ध , नानक , कबीर इ .
   •  संकुषित धार्मिकता त्यांना मान्य नव्हती . त्यांच्यामते              कायद्यापुढे सर्व धर्म समान असावे , स्वतंत्र भारताचे              उद्दिष्ट  निधर्मी राज्य असावे . तसेच समाजातील सर्व            सामाजिक तु  नैतिक सुधारणा सद्सद्विवेकबुद्धीवर              अवलंबून असतात असे ते म्हणत .

> समाजातील सर्व सामाजिक सुधारणा व नैतिक सुधारणा       लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर अवलंबून ,

 ग्रंथक्रम -

    • प्राचीन भारतीय व्यापार - १ ९ १५
    • भारतीय जातिसंस्था , तिची यंत्रणा , उत्पत्ती व विकास -        १ ९ १६
    • भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक                 पृथक्षरणात्मक परिशीलन ( १ ९ १६ )
    • The Evolution of Provincial Finance in          British India - १ ९ २४ ( इव्हॉल्युशन ऑफ                  प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया )
    • Casts in India - १ ९ २४ ( कास्टस इन इंडिया )
    • Annihilation of Cast - १ ९ ३७ ( अॅनहिलेशन          ऑफ कॉस्ट )
    • Thoughts on Pakistan - १ ९ ४० ( थॉटस ऑन         पाकिस्तान )
    • Ranade , Gandhi & Jina - १ ९ ४३ ( रानडे ,             गांधी व जीना )
    • काँग्रेस व गांधी यांनी अस्पृश्य वर्गास कसे वागवले -
      १ ९ ४५
    • Who were the shudras - १ ९ ४६ हा ग्रंथ म .          जोतीबा फुले या आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ शूद्रास            अर्पण केला .
    • The untouchables - १ ९ ४८ ( द अनटचेबल्स )
    • Thoughts on lingvistatic states - 9844            • Bhuddha & his dhamma - १ ९ ५७ - मरणोत्तर         प्रकाशित ( बुद्ध अॅण्ड हिज धम्म )
    • Riddles in Hinduism - १ ९ ५७ ( रिडल्स इन             हिंदूइझम )


डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन -


> डॉ . आंबेडकरांनी - अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी अत्यंत           सखोल अध्ययन केले होते .

> आफ्रिका - अमेरिकेतील निग्रो समाज , रोमन                       साम्राज्यातील  गुलाम समाज किंवा ज्यू समाज असो ,           प्रत्येक समाजव्यवस्थेचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला       होता .

> अस्पृश्यतेचा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास
   केला .
> गुलामगिरी व अस्पृश्यता यांची तुलना करताना डॉ .               बाबासाहेग म्हणतात ,

> " गुलामीची पद्धत ही अस्पृश्यतेच्या तुलनेत चांगली आहे .     कारण गुलामांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास                 करण्याची  संघी होती ; पण अस्पृश्यांना मात्र आपल्या           व्यक्तिमत्वांचा विकास करण्याची संधी सुद्धा नव्हती . "

> गुलामगिरी बंधनकारक नव्हती अस्पृश्यता बंधनकारक           आहे .

> अस्पृश्यता ही मुक्त नसलेली - बंदिस्त समाजव्यवस्था
   आहे .
> गुलामी करण्याची सक्ती नव्हती ( ऐच्छिक प्रकार ) पण         अस्पृश्यता निवडून घेण्याचा प्रकार नव्हता तो जन्मतःच         चिकटलेला होता .

> अस्पृश्यता ही अप्रत्यक्ष गुलामी असून , गुलामीपेक्षाही तो        सर्वात वाईट प्रकार आहे .

> अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे जातिव्यवस्था नष्ट करणे -          जात नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाही ,      असे त्यांचे स्पष्ट मत होते

> अस्पृश्यतेवरील बाबासाहेबांचा सविस्तर ग्रंथ -
   (1) The Untouchables ,
   (2)who are they & why they become                    untouchables ? ( १ ९ ४८)

> आपल्या संशोधनातून ते है स्पष्ट करतात की अस्पृश्य हे         मूळचे वाताहात झालेले लोक ( Broken Man )
   आहेत .

> अस्पृश्य असल्यामुळे त्यांना हद्दपार करून व्यायाबाहर           राहाण्यास भाग पाडले नाही , तर ते सुरुवातीपासूनच             गावाबाहेर राहत होते . कारण ते वाताहत झालल अंक हात     व स्थिर झालेल्या टोळीपेक्षा ते वेगळ्या टोळीतील होते .

> स्टॅनले राइस - यांनी अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा वरभेदावर         आधारित व व्यवसायावर आधारित असे दोन सिद्धांत           मांडले .

> डॉ. बाबासाहेबांनी या सिद्धांताचे खंडन केले - स्वतःचे          काही विचार मांडले .
   ( १ ) बौद्ध धर्माबद्दलचा तिरस्कार हे अस्पृश्यतेचे मूळ
           आहे . जे बौद्धधर्मिय होते . त्यांच्याबद्दल ब्राह्मणांनी               पसरवलेला द्वेष व तिरस्कार हे अस्पृश्यतेच्या                       उगमाच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे .
   ( २ ) गोमांस भक्षण - पूर्वी यज्ञात बळी जाणाऱ्या प्राण्यांचे             मांस पुजारी खायचे . पण बौद्ध धर्मात - पशुबळीचा             तीव्र विरोध , बौद्ध धर्माचा लोकांवर इतका प्रभाव                 पडला की , वाताहात झालेले लोक देखील बौद्ध                   धर्माचे अनुयायी झाले . त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रभाव             कमी करण्यासाठी - ब्राह्मण वर्गान - मांस खाणे                  सोडून ते पूर्ण शाकाहारी झाले . पण वाताहत                      झालेल्या  लोकांनी - गोमांस खाणे सुरू ठेवल्यामुळे              ब्राह्मणांनी त्यांना अस्पृश्य ठरवले .

> समता , स्वातंत्र्य , बंधुत्व या तत्त्वावर आधारित असलेली       न्यायाची कसोटी व सामाजिक उपयुक्ततेची कसोटी या           दोन्ही कसोट्यांवर बौद्ध धर्म खरा उतरतो असे त्यांचे मत       होते .

> आदर्श समाज हा स्वातंत्र्य , समता , बंधुता या                     संकल्पनांवर  आधारित असावा .

> १ ९ २० पासून ते १ ९ ५६ पर्यंत त्यांनी भारतीय समाजात     बदल घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले पण               त्यांच्या  लक्षात आले की , व्यक्तीच्या श्रद्धा - परंपरा             बदलल्याशिवाय कोणतेही परिवर्तन होऊ शकत नाही .           म्हणून त्यांनी बौद्ध धम्माचा मार्ग स्वीकारला .

> चार्तुवर्ण्य व जातिव्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्थेचा         त्याग करून समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण                 करण्याच्या प्रक्रियेचा तो एक महत्त्वाचा पैलू होता .

> बहिष्कृत हितकारिणी सभा ( २० जूलै १ ९ २४ ) मुंबई 
   येथे . 
   • या सभेचे ब्रीदवाक्य होते शिका , संघटित व्हा आणि              संघर्ष करा ,
   • उद्दिष्टे - समाजात जागृती निर्माण करणे , मानवी हक्कांचे        संरक्षण करणे , शिक्षण देणे , आर्थिक स्थिती सुधारणे
      इ .
   • सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ . बाबासाहेब
      होते . तर सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते .

> सायमन कमिशन - बाबासाहेबांनी सायमन कमिशनला दोन     खलित पाठवली .
   ( १ ) अस्पृश्यांच्या हक्कांसंबंधी
   ( २ ) मुंबई प्रांतात कोणते राजकीय हक असावेत
          याबाबत , सायम कमिशनने अस्पृश्यांना राजकीय                हक्क द्यावेत अशी शिफारस केली पण त्यातील                    तरतूर्दीना बाबासाहेबांनी विरोध केला . महारांची                  गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी १ ९ मार्च १ ९ २८            ला मुंबई कायदेमंडळात ' महार वतन बिल ' मांडले .

> १ ९ १८ साली बाबासाहेबांनी ' स्मॉल होल्डिंग इन इंडिया '     हा शोधनिबंध लिहिला होता . त्यात त्यांनी जास्त                 संततीमुळे  होणारे शेतीचे तुकडे व त्यामुळे उभे राहणारे         प्रश्न  यांची चर्चा केली होती .

> १ ९ ३८ ला त्यांनी कुटूंब नियोजनाचा आग्रह धरत               त्यासाठी  कायदा करावा म्हणून विधिमंडळात विधेयक         आणले ,

> २० जूलै १ ९ ४२ ला बाबासाहेब म्हणाले होते की ,               कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या             प्रगतीवरून मोजली जाते . हिंदु कोड बिलाद्वारे सर्व               स्त्रियांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी ते
   लढले ,

> ओबीसीच्या प्रगतीसाठी : १ ९ ३० ला त्यांनी स्टार्ट                कमिटीच्या अहवालात त्यांना आरक्षण व कायदेशीर              संरक्षण देण्याची शिफारस केली .

> मराठवाडा मुक्तिसंग्राम व डॉ . बाबासाहेबांची भूमिका 

   • निझाम राजवटीत पश्त आकाम ही संघटना होती . या            संघटनेतील काही दलित नेते या राजवटीचे समर्थन
      करत ,  हैद्राबादमधील दलित नेते व्यंकटराव व शामसुंदर        हे जहाल भाषेत दलितांना प्रक्षोभित करून                          निझामावरील  निष्ठा व्यक्त  करत , पण संस्थानचे सर्व            दलित ' पश्त अवाम'मध्ये नव्हते . स्टेट काँग्रेस , आर्य            समाज हिंदु महासमा यातही पुष्कळ दलित कार्यकर्ते            होते .
    • डॉ . बाबासाहेबांचा व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा
      ( SCF ) स्वांतत्र्य संग्रामाला पाठिंबा होता . नांदेडला             SCF द पश्त अक्रामच्या कार्यकांत संघर्ष झाल्याची नोंद         आहे .
    • बाबासाहेबांनी संस्थांनातील जनतेला आवाहन केले की ,        त्यांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे . निझाम हा            भारताचा शत्र आहे म्हणून अनुसूचीत जातीतील एकाही        माणसाने निझामाची बाजू घेऊन आपल्या समाजाला            काळिमा फासू नये अशी विनंती त्यांनी केली होती .
     ' निझाम हा शत्रू आहे . त्याची बाजू घेऊ नका ' असे             बाबासाहेबांनी , २७ नोव्हेंबर १ ९ ४७ ला जाहीरपणे             घोषित केले .


> संयुक्त महाराष्ट्राबाबत डॉ . बाबासाहेबांची             भूमिका

    • भाषावार प्रांतरचना केल्यास ऐक्य कमी होऊन भारताचे         अधिक तुकडे पडतील असे बाबासाहेबांना वाटत होते .
    • भाषावार प्रांतरचनेचाच निर्णय झाल्यास संयुक्त                     महाराष्ट्रात उपप्रांत निर्माण न करता एक भाषा एकच             प्रांत करावा असे त्यांचे म्हणणे होते .
    • मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याने                त्याचा  समावेश संयुक्त महाराष्ट्रातच केला जावा असा            त्यांचा आग्रह होता .
    • १ ९ ४८ च्या दारः आयोगाला दिलेल्या निवेदनातही              त्यांनी हीच भूमिका मांडली होती .


     आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.