Pages

Sunday, June 7, 2020

महात्मा गांधी

               

                         महात्मा गांधी


» १ ९ २० ते १ ९ ४८ हा कालखंड - गांधी युग म्हणून               ओळखला जातो .

» महात्मा गांधी व्यवसायानिमित्त द . आफ्रिकेत गेल्यावर         त्यांनी तेथे अहिंसात्मक सविनय कायदेभंगाची चळवळ         सुरु  केली . अखेर द . आफ्रिका सरकारने नमते घेऊन
   १ ९ १४ ला भारतीयांवर अन्यायकारक असलेले कायदे रद्द     केले .

» १ ९ १५ ला गांधी भारतात परतल्यावर त्यांनी बिहारच्या         चंपारण्यामधील नीळच्या शेतीवर काम करणाऱ्या भारतीय     मजुरांना संघटित केले .

» यानंतर सक्रिय राजकारणात त्यांनी सहभाग घेण्यास             सुरुवात केली . इंग्रजांना " सैतान ' म्हणून १ ९ २० ला           असहकार चळवळ सुरु केली . सविनय कायदेमंग
   ( १ ९ ३० ) , वैयक्तिक सत्याग्रह ( १ ९ ४० ) , छोडो भारत     चळवळ ( १ ९ ४२ ) या चळवळींमध्ये जनतेचे नेतृत्व             पत्करत एका मोठ्या लढ्यासाठी त्यांनी जनतेला जागृत         करून संघटित होण्यासाठी प्रयत्न केले .

» स्वदेशी उद्योग व्यवसायांना चालना देणे , दारुबंदी ,               मिठाचा  सत्याग्रह , खेड्यासारखे जनआंदोलन सतत             चांगल्या मार्गाचा ध्यास , बुनियादी शिक्षण ( वर्धा शिक्षण       योजना ) अशाप्रकारे समाजातील सर्व स्तरांचा समावेश         होईल , त्यांना चालना मिळेल , त्यांचा विकास होईल             यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले ,

» जनआंदोलनात स्त्रियांच्या वाढत्या सहभागास गांधींच्या         चळवळीपासून सुरुवात झाली .

» गांधींचा सत्यावर विश्वास होता . " सत्य म्हणजे ईश्वर आणि     ईश्वर म्हणजे सत्य " त्याचप्रमाणे " ईश्वर हेच प्रेम व प्रेम हेच     ईश्वर " असे ते म्हणत . काहींच्या मते त्यांचे सत्य हे तत्त्व         हिंदु धर्मातील आहे तर अहिंसा तत्त्व बौद्ध व जैन धर्मातून       घेतले .

» भारताच्या स्वातंत्र्याबद्दल त्यांचे मत होते " सैतानाशी             अहिंसा व असहकाराच्या मार्गाने लढले तर भारताला             Panciza fog tones . " ( Freedom for India       was to be won through Non - violence &       Non - cooperation with the evil - doer . )

» ' यंग इंडिया ' मध्ये गांधी लिहितात - " हिंसेने भरलेल्या         वातावरणात अहिंसा तत्त्व अवलंबणारे ऋषीमुनी                   न्युटनपेक्षा  अधिक प्रज्ञावंत होते . तसेच . वेलिंग्टनपेक्षा         वीर  योदे होते .

» गांधीच्या सत्याग्रहाने लोकांच्या मनात निर्भयता तयार
   केली . पोलीस , तुरुंग , अधिकारी याबद्दलची भीती काढून     टाकली . गांधीच्या मते - " सत्याग्रह आणि असहकार           बोलघेवड्यांची व थापा मारणाऱ्यांची शस्त्रे नव्हेत .               त्यासाठी प्रामाणिकपणा हवा ; भरीव मूक त्यागाची तयारी     हवी. "

»  गांधींचे रचनात्मक कार्यक्रम 

   ( १ ) त्यांना फक्त राजकीय स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर                 जनतेची सामाजिक , आर्थिक , आत्मिक प्रगतीही                 अपेक्षित होती . त्यतून त्यांनी ग्रामउद्योग संघ ,                     बेसिक  एज्युकेशन सोसायटी , गोरक्षण संस्था                     स्थापन केल्या .
   ( २ ) समाजातील शोषण संपविण्यासाठी आर्थिक                       विकेंद्रीकरणाचा मार्ग त्यांनी सांगितला . ' विश्वस्त                 संकल्पना मांडली . " आपल्या संपत्तीचे आपण                   मालक नसून विश्वस्त आहोत त्यामुळे गरजेपुरती                   ठेवून उरलेली समाजाच्या कामी लावावी . "
   ( ३ ) कुटिरोद्योगांना प्रोत्साहन दिले . त्यांच्या आर्थिक                   कार्यक्रमाचे प्रतीक खादी होते .
   ( ४ ) समाजातील विषमता , भेदाभेद , जातीयता नष्ट                   करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले . १ ९ ३२ मंतर                   हरिजनांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले . हिंदू -               मुस्लिम ऐक्य व दारुबंदीसाठी प्रयत्न केले .
   ( ५ ) भारताला बलवान बनविण्याचा कार्यक्रम समजावून               सांगताना गांधी हाताची पाच बोटे दाखवत , त्यांच्या               मते प्रत्येक बोट म्हणजे सूतकताई , अस्पृश्यता                     निवारण , नशाबंदी , हिंदु - मुस्लिम स्नेहभाव व                   स्त्रियांकरता समानता .

» गांधीबद्दल इतर काही विचार 

   • गांधीच्या जनआंदोलनामुळे शासनाला आव्हान दिले गेले       असे सांगून काही विचारवंत त्यांना ' अराजक माजविणारे       विचारवंत ' ( a philosophical anarchist )
     म्हणतात .

  • लॉर्ड लिनलियगो - गांधींच्या मार्गाला फसवणूक ,                 ब्लॅकमेलिंग म्हणतो .

  • पण गांधी मात्र स्वतःच्या भूमिकेला - सत्याचा मार्ग                म्हणतात . " स्वातंत्र्यासाठी मी ३०० वर्षे वाट पहायला          तयार आहे पण अनुचित मार्गाचा अवलंब कधीही करणार      नाही .

» " मानवी इतिहावर गांर्थीचा प्रभाव हिटलर व स्टॅलिनपेक्षा         निश्चितच चिरकाळ टिकेल " - अर्नाल्ड टायन्वी

» " जेव्हा गांधींजी चूक असतात तेव्हा ते आमच्या बरोबर           असण्यापेक्षाही अधिक बरोबर असतात . " - आचार्य             कृपलानी

» " गांधींजी हे राजकारणातील संत व संतामधील                      राजकारणी  आहेत . "


             गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन 


» पुणे करारानंतर गांधींच्या सामाजिक कार्यात अस्पृश्यता         निर्मूलनाला अग्रक्रम मिळाला .

» पुणे करारात - दलितांना विभक्त मतदारसंघाऐवजी - जागा    वाढवून दिल्या . प्रांतिक ७१ वरून - १५७ केल्या . केंद्रीय -    राखीव जागा - एकूणच्या १८ % केल्या .

» या आधीच्या - जातीय निवाडा ( १ ९ ३२ ) व विभक्त           मतदारसंघ यांचा विचार करता यात दलितांवर होणाऱ्या         अन्याय - अत्याचाराबाबत काहीही तरतूद नसल्याने               गांधींचा  त्याला विरोध होता .

» तसेच एकदा दलितांना स्वतंत्र जमात मानल्यास -                 अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्नच उद्भवणार नव्हता व त्यामुळे       सामाजिक सुधारणांच्या कार्यालाही काही अर्थ उरला             नसता  असेही त्यांचे मत होते . पुजणांना जरी हौतात्म्ये         पत्करावे लागले तरी सवर्ण हिंदुंनी आपल्या धर्मातील             असहाय्य स्त्री - पुरुषांवर केलेल्या

» पुणे कराराच्या आधी - गांधी म्हणतात - माझ्या मते माझा      जीव फारसा महत्त्वाचा नाही . या उदात्त कार्यासाठी

» यानंतर - अस्पृश्यता निवारणाचे काम त्यांनी हाती घेतले -      अत्याचारांचे परिमार्जन होणार नाही . "
   • हरिजन सेवक संघाची स्थापना केली
   • हरिजन दौरा - ७ नोव्हें . १ ९ ३३ ते २ ९ जुलै १ ९ ३४           वध्यपिासून सुरुवात करून संपूर्ण देशाचा दौरा केला .

» आपल्या संपूर्ण अस्पृश्यता निर्मूलन कार्यात गांधींचा               दोन गोष्टीवर भर -
   ( १ ) सवर्णांकडून अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात            आवाज उठवणे .
   ( २ ) अस्पृश्यतेचे समूळ उचाटन करणे .


» गांधींच्या मते

   ( १ ) अस्पृश्यतेच्या प्रथेला मुळात हिंदू धर्माचीच मान्यता
           नाही . जर धर्मग्रंथांमध्ये असा काही उल्लेख असेल               तर मानवी प्रतिष्ठेपुढे कोणी मोठे नसल्याने असे                   धर्मग्रंथही मानू नये .
   ( २ ) रोटी - बेटी व्यवहार व अस्पृश्यता निर्मूलन - यांची                 सांगड घालू नये . कारण त्यांच्या मते – रोटी - बेटी               पसल बंधने गेलीच पाहिजेत पण ती सवर्ण व                       अस्पृश्य  दोघांमध्ये पाळतात . त्यामुळे खरा भर                   अस्पृश्यतेमुळे सहन कराव्या लागणान्या अन्यायावर               करावा .
   ( ३ ) अस्पृश्यता निर्मूलन व जातिनिर्मूलन यात फरक –                 गांधीजी वर्णाश्रम व्यवस्था मानत - या व्यवस्थेत                   काही  दोष असले तरी त्यात अस्पृश्यतेप्रमाणे पाप               नाही . अस्पृश्यतेचे निर्मूलन केल्यास वर्णाश्रम पद्धत             चांगल्या रीतीने कार्य करेल - यात प्रत्येक जात                     दुसरीला पूरक असेल के कोणतीही जात - श्रेष्ठ -                   कनिष्ठ असणार नाही . त्यामुळे जात नष्ट करण्याची               गरज नाही . या उलट डॉ . बाबासाहेब म्हणतात - '               अस्पृश्यता हे जातिव्यवस्थेचे फळ आहे . जोपर्यंत                 जात नष्ट होत नाही . तीपर्यंत अस्पृश्यता कायम                   राहील .
   ( ४ ) बाबासाहेब व इतर काही नेते गांधींवर टीका करत                 तेव्हा गांधींनी टीका समजून घेताना म्हटले . " ज्या               समाजव्यवस्थेने अस्पृश्यांवर वर्षानुवर्षे अन्याय केला             त्याचाच मी एक भाग असल्यास - त्यांना                             माझ्याविषयी अविश्वास वाटणे साहजिकच आहे .
   ( 5 ) सवर्ण हिंदूंनाही ते म्हणतात - आपल्याला हिंदू धर्म                 जगवायचा असेल तर आपण - अस्पृश्यतेची प्रथा                 संपवावी , व जर आपणास अस्पृश्यतेची प्रथा नष्ट                 करायची नसेल तर आपण हिंदू धर्माच्या अस्तित्वाची             किंमत मोजण्यास हवी .
   ( ६ ) अस्पृश्यतेचा प्रश्न सुटल्यास - धार्मिक व इतर प्रश्नांवर             त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल . कारण हिंदूधर्मीय             लोक बिगरहिंदूंनाही अस्पृश्यासारखेच मानतात ,                   त्यामुळे जर हा प्रश्न सुटला तर सर्व भारतीयांना एकत्र             येण्यास वेळ लागणार नाही .
  ( ७ ) अस्पृश्यतेविरुद्धचा लढा म्हणजे विषमतेविरुद्धचा                  लढा
  ( ८ ) यासाठी गांधींचा मार्ग - अहिंसावादी , मतपरिवर्तनावर            भर देणारा , हृदयाला आवाहन करणारा होता .
  ( 9 ) अस्पृश्यता निर्मूलनाची ही चळवळ राजकीय नसून                हिंदू धर्म व समाजाच्या शुद्धीकरणाची ती मोहीम आहे            यावर त्यांनी भर दिला पण या चळवळीचे राजकीय              परिणाम म्हणजे - राष्ट्रीय चळवळीत हा वर्ग कोणत्या             ना कोणत्या मार्गाने ओढला गेला .
 ( १० ) अस्पृश्यांनी स्वत : मध्येही सुधारणा घडवून आणणे               करणे अपेक्षित होते .
        • शैक्षणिक पात्रता वाढवणे , स्वच्छता - आरोग्याची                काळजी घेणे . इ .


» गांधींशी संबंधित स्थळे 

   ( १ ) कीर्ती मंदिर , पोरबंदर ( गुजरात ) - जन्मस्थळ
   ( २ ) फिनिक्स आश्रम व टॉलस्टॉय फार्म . - द .                           आफ्रिकेतील वास्तव्यात या ठिकाणी सत्याग्रहाची                 संकल्पना विकसित केली .
   ( ३ ) मणीभवन ( मुंबई ) -१ ९ १५ ला द . आफ्रिकेतून                 परत आल्यावर टिळक , गोखले व दादाभाई नौरोजी             यांनी त्यांचे स्वागत या ठिकाणी केले होते .
   ( ४ ) चंपारण्य ( बिहार ) - गांधीचा पहिला सत्याग्रह . १ ९             १७ ते १ ९ ३० या काळातील वास्तव्याचे ठिकाण ,
   ( ५ ) साबरमती आश्रम ( गुजरात )
   ( ६ ) मदुराई ( तामिळनाडू ) १ ९ २१ ला गांधींनी पाश्चात्त्य             वेशभूषा सोडून पंचा नेसण्यास सुरुवात केली .
   ( ७ ) आगाखाना पॅलेस ( पुणे ) - १ ९ ४२ ते ४४ च्या                   काळात तुरुंगात ठेवण्यात आले .
   ( ८ ) बेलियाघाट ( कोलकाता ) - १५ ऑगस्ट १ ९ ४७ ला             गांधी या ठिकाणी होते .
   ( ९ ) नौखाली ( बांग्लादेश ) भारताच्या फाळणीनंतर                     झालेल्या दंगली थांबविण्यासाठी गांधींनी येथे                       आमरण  उपोषण केले .

» गांधींच्या जीवनाचा कालपट 

   • ऑक्टोबर १८६ ९ - पोरबंदर येथे जन्म
   • सप्टेंर १८८८ - लंडनसाठी रवाना . जून १८ ९ १ ला परत
   • मे १८ ९ ३ - गुजराती व्यापाऱ्याचा कोर्टामध्ये दावा               चालविण्यासाठी द . आफ्रिकेला
   • १ ९ ०६ - भारतीय लोकांसाठी अपमानास्पद ठरलेल्या            कायद्याच्या विरोधात सत्याग्रह
   • जानेवारी १ ९ १५ - भारतात आगमन
   • १ ९ १६ - लखनौ अधिवेशनात सहभाग
   • १ ९ १७ चंपारण्य सत्याग्रह
   • १ ९ १८ - अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा
   • १ ९ २० - असहकार चळवळ
   • १ ९ २४ - बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष
   • १ ९ २८ - बार्डोली वल्लभभाईंच्या नेतृत्वात चळवळ
   • १ ९ ३० - दांडी यात्रा , मिठाचा सत्याग्रह
   • १ ९ ३१ - गोलमेज परिषदेसाठी लंडनला
   • १ ९ ३२ - गांधी - आयर्विन करार
   • मे १ ९ ३३ - आत्मशुद्धीसाठी उपोषण
   • १ ९ ४० - वैयक्तीक सत्याग्रहास सुरुवात   
   • १ ९ ४२ - चलेजाव घोषणा
   • २५ ऑक्टोबर १ ९ ४६ - नौखाली सत्याग्रह
   • १३ जानेवारी १ ९ ४८ - हिंदू - मुस्लिम दंग्याविरुद्ध                उपवास
   • ३० जानेवारी १ ९ ४८ नथुराम गोडसेच्या गोळीबारात            मृत्यू

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.