MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Tuesday, June 16, 2020

कर्मवीर भाऊराव पाटील


                  कर्मवीर भाऊराव पाटील


        कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म इ . स . १८८७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला . त्यांचे गाव ऐतवडे हे होय . त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते . भाऊरावांचे बालपण कुंभोज , तासगाव , दहिवडी , विटा यांसारख्या गावी गेले . त्यांचे प्राथमिक शिक्षणही असेच निरनिराळ्या गावी झाले . भाऊराव पाटील विट्याच्या शाळेतून मराठी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले . तेथे त्यांनी इंग्रजी सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले . मॅट्रिक होण्यापूर्वीच त्यांना शिक्षण सोडावे लागले . कोल्हापूरच्या सात वर्षांच्या वास्तव्यात त्यांची शालेय शिक्षणात विशेष प्रगती दिसून आली ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले . यापुढे काही दिवस त्यांनी संस्कृत विषयाच्या नाही . याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला आणि शिकवण्या केल्या . 

कार्य 
० काही काळ भाऊराव पाटील यांनी ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लि . या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम केले . त्यानिमित्त महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर केलेल्या भ्रमंतीत त्यांना बहुजन समाज अज्ञान व अंधश्रद्धा यांमध्ये पार अडकून गेला असल्याचे आढळून आले . त्यातून त्यांच्यातील समाजसेवक जागी झाला . समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही ही जाणीव झाल्याने त्यांनी महात्मा फुले व राजर्षि शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल टाकायचे ठरविले . 

० इ.स. १ ९ १० मध्ये भाऊराव पाटील यांनी दुधगाव येथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने ' दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ' या नावाची संस्था स्थापन केली . तिच्यामार्फत ' दुधगाव विद्यार्थी आश्रम ' हे वसतिगृह सुरू केले . तेथे सर्व जातिधर्माचे विद्यार्थी एकत्र राहात असत . पुढे दुधगावच्या धर्तीवर नेर्ले व काले या गावीही भाऊरावांनी वसतिगृहे सुरू केली .

० १ ९ १ ९ मध्ये त्यांनी काले येथेच रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली .

० इ.स. १ ९ २४ मध्ये भाऊरावांनी रयत शिक्षणसंस्थेच्या वतीने सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले .  

० इ.स. १ ९ २४ मध्ये भाऊराव सातारा येथे वास्तव्यास गेले . त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातान्यातच ठेवण्यात आले .

० इ . स . १ ९ ३५ मध्ये भाऊराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे “ सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज ' सुरू केले.

 ० इ . स . १ ९ ३७ मध्ये झालेल्या प्रांतिक कायदे मंडळासाठीच्या निवडणुकीत मुंबई प्रांतासह अनेक प्रांतांत काँग्रेसची मंत्रिमंडळे अधिकारावर आली . मुंबई प्रांतांच्या सरकारने जनतेत साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी खाजगी शिक्षणसंस्थांना प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला . 

० भाऊरावांनी या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शाळा उघडल्या . 
इ.स. १ ९ ४० मध्ये भाऊरावांनी सातारा येथे महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने माध्यमिक शाळा सुरू केली . 

० इ.स. १ ९ ४७ मध्ये रयत शिक्षणसंस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज या नावाने पहिले महाविद्यालय सुरू केले . 

० इ . स . १ ९५३-५४ या वर्षी संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्या ४४ इतकी होती . कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १०१ माध्यमिक शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडला होता व आपल्या हयातीत तो पूर्ण केला. 

० भाऊराव पाटील यांची शिक्षण संकल्पना : 
● ' स्वावलंबन , स्वाभिमान , स्वाध्याय व स्वातंत्र्य ' ही शिक्षणाची चतुःसूत्री होती . 
● ' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे रयत शिक्षणसंस्थेचे घोषवाक्य आहे . 
● स्वावलंब शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी ' कमवा व शिका ' ही योजना सुरू केली . 

० पुरस्कार 
• भारत सरकारने ' पद्मभूषण ' हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले . 
पुणे विद्यापीठाने ' डी . लिट ' ही सन्मानदर्शक पदवी त्यांना बहाल केली .  

० विशेषता 
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी भाऊरावांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले होते ,
" भाऊराव का कार्यही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है । ".

० कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अपूतपूर्व क्रांती घडवून आणली . शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखल्यामुळेच ते . सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची जिद्द त्यांनी बाळगली . 

० वडिलांन नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी फिरावे लागल्यामुळे भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले . पाचवीनंतर कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये आले त्यावेळी त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था जैन वसतिगृहात झाली . तेथील कडक शिस्त व माऊरावांचा स्वातंत्र्यवादी स्वभाव यामुळे त्यांना पुढे शिक्षण सोडावे लागले .

० अभ्यासाऐवजी कुस्ती , मल्लखांब यामध्ये त्यांना जास्त गति होती . त्यामुळे शाहू महाराजांच्या वाड्यात त्यांना आश्रय मिळाला . तेथे सामाजिक सुधारणांचा वारसा त्यांना मिळाला . 
० शिक्षण बंद झाल्याने अनेक व्यवसाय , कामे करावी लागली . जवाहयाच्या दुकानात काम केले , संस्कृतच्या शिकवण्या घेतल्या . किर्लोस्कर व ओगले कारखान्यातील उत्पादनाचे फिरते एजंट म्हणून काम
 केले . 

० व्यवसायानिमित्त जसजसा त्यांचा प्रवास वाढला , फिरणे वाढले त्यातून एक बाब त्यांच्या निदर्शनास आली की , शिक्षणाला खूप महत्त्व आहे . विचार , उच्चार व वर्तणूक या सर्वांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण ! सत्य , समता , व धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे शिक्षण . 

० जोपर्यंत बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही हे त्यांनी ओळखले . त्यातून विविध शिक्षणसंस्थांची स्थापना त्यांनी आयुष्यभर केली . 

० जातिभेदाला विरोध व समतेचा पुरस्कार करणा - या सत्यशोधक समाजाचा त्यांच्यावर प्रभाव होता . 

० समाजात बदल व्हायचे असतील तर समाजशिक्षण गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले . स्वावलंबन , स्वाभिमान , स्वाध्याय व स्वातंत्र्य या चतुःसूत्रीवर त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची उभारणी झाली होती . 

० भाऊराव पाटलांच्या ' रयत शिक्षण संस्थेचे - 
ब्रीदवाक्य होते. -  " स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद .

० छ . शाहू महाराज व महर्षि कर्वे यांच्या कार्याचा समन्वय म्हणजे कर्मवीरांची वसतिगृहे . वसतिगृहयुक्तशाळा हा त्यांच्या कार्याचा कणा होता . त्यांनी ब्राह्मणेतर अस्पृश्य अश्या समाजातील सर्व घटकांसाठी सामाईक वसतिगृहे स्थापन केली . त्यांच्या संस्थेत जातीभेद , धर्मभेद यांना जागा नव्हती .

० भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ( १ ९ ५ ९ ) तर पुणे विद्यापीठाने डी . लिट पदवी दिली . 

० रयत शिक्षण संस्थेची स्थापना करतांना दत्ताजी पाटील , भाऊराव चौगले , नरुकाका खोत या कार्यकत्यांनी भाऊराव पाटलांना मदत केली . 

० कर्मवीर भाऊराव पाटलांना ' आधुनिक भगीरथ ' असे संबोधले जाते . 

० भाऊराव पाटलांविषयी काही मते 
● " महाराष्ट्राचे बुकर टि वॉरिंग्टन ' ' ह . रा . महाजनी . 

● भाऊराव का कार्यही उनका सचा कीर्तीस्तंम है । " -
 म . गांधी . 
● " कर्मवीर ही एक व्यक्ती नव्हती . ती एक संस्था होती . बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले . त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा " - यशवंतराव चव्हाण , 

भाऊराव पाटलांच्या जीवनाचा कालपट . 
● जन्म २२ सप्टेंबर १८८७ कुंभोज ( कोल्हापूर ) 

● मूळगाव - ऐतवडे , वडील - पायगोंडा . आई - गंगाबाई 

● १९०१-१९ २ ओगले ग्लास वर्क्स या किर्लोस्कर ब्रदर्स लि . कंपनीत . 

● १ ९ १० - बुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना . 

● १ ९ १ ९ - ' रयत शिक्षण संस्था काले ( ता . कराड ) 

● १ ९ २४ रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय ' सातारा येथे नेले . याच संस्थेचे नामकरण १ ९ २७ ला श्री छत्रपती शाहू बोर्डिंग असे केले . 

● १ ९ ३५ - Silver Jubilee Training College 
प्रा . शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी. 

●१ ९ ४० छ . शिवाजी महाविद्यालय हे पहिले कॉलेज . कमवा व शिका योजना सुरु . 

●१ ९ ४२ च्या आंदोलनात भूमिगत क्रांतिकारकांना
 मदत . 

● १ ९ ५ ९ पद्मभूषण , पुणे विद्यापीठाची डि.लिट् . 

● ९ मे १ ९ ५ ९ - मृत्यू .


अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.