MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Saturday, June 6, 2020

बाळ गंगाधर टिळक

   
                 

                   बाळ गंगाधर टिळक 


( १ ) सामान्य जनतेशी जवळचा संपर्क ठेवणारे टिळक हे पहिले राष्ट्रीय नेते होते .
( २ ) देशासाठी तुरुंगात जाणारे टिळक हे पहिले काँग्रेस नेते होते .
( ३ ) टिळकांनी सर्वात प्रथम स्पष्ट शब्दात स्वराज्याची मागणी केली .
        स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या त्यांच्या घोषणेने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण पसरले .
( ४ ) ' लोकमान्य ' व ' भारताचा अनभिषिक्त राजा ' (Uncrowned King of India ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळकांनी जनतेमध्ये देशभक्तीची भावना रुजविली व काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीला व्यापक जनाधार मिळवून दिला .


>  जनतेला संघटित करण्यासाठी त्यांनी आखाडे ,
लाठीक्लब , गो वध विरोधी संस्था गणपती व शिवाजी उत्सव सुरु केले .


>  टिळकांचा काँग्रेसमधील मवाळ गटाला विरोध होता . त्यामुळे त्यांनी बिपिनचंद्र पाल व लाला लजपतराय यांच्यासोबत ' जहाल गेट ' निर्माण केला .


>  त्यांच्या प्रयत्नांमुळे १ ९ ०६ च्या कोलकाता अधिवेशनात
' स्वराज्य , बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ' हे ठराव संमत करण्यात आले .


>  टिळकांची मागणी स्वराज्याची होती . ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीचे शासन त्यांना मान्य नव्हते .


>  टिळाकांची विचारपद्धती स्पष्ट होती . बोलणे रोखठोक व सडेतोड होते कारण उद्दिष्ट पक्के होते पण त्यांच्या या वागण्याने ब्रिटिश नोकरशाही रुष्ट होती .
' व्हेलेंटाइन चिरोल ' यांने टिळकांचा ' भारतीय असंतोषाचे जनक ' असे - संबोधले . टिळकांनी त्याच्यावर मानहानीचा खटला टाकला त्यासाठी ते इग्लंडला गेले होते .


>  पहिल्या युद्धाच्या काळात त्यांनी जनतेला आवाहन केले की , त्यांनी युद्धकाळात ब्रिटिशांना सहकार्य करावे . कारण त्यानंतर स्वशासनाचे अधिकार मिळतील असे त्यांना
 वाटायचे .


>  टिळकांना राजकीयदृष्ट्या जहालवादी पण सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मवाळवादी मानले जाते .
( Extremist in Politics but a moderate in Social Reforms )


>  त्यांनी संमतीवयाच्या कायद्याचा विरोध केला तो या भूमिकेतून की , आमच्या सामाजिक सुधारणा आम्ही कर , त्याबाबत परकीयांना कायदे करण्याचा अधिकार नाही .


>  देश पारतंत्र्यात खितपत असतांना खऱ्या समाजसुधारणा शक्य नाही म्हणून प्रथम राजकीय अधिकारप्राप्तीसाठी समाजाची जागृती व संघटना आवश्यक आहे . एकदा स्वशासनाचे अधिकार मिळाले की , समाजसुधारणा सहजपणे करता येतील .


>  बॅरिस्टर जीना टिळकांना गुरुस्थानी मानत इतकेच नव्हे तर त्यांच्या अंत्ययात्रेवेळी जीनांनी त्यांना खांदा दिला


>  गांधीनी अंगिकृत केलेले - बहिष्कार , स्वदेशी , जनआंदोलन या धोरणांचा उगम टिळकांच्या विचारसरणीत व कार्यात दिसते.


>  टिळक हे निष्णात गणितज्ज्ञ होते , ' भाषातज्ज्ञ होते . भारतीय धर्मग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता .


>  गोखले हे काळाच्या बरोबर होते तर टिळक काळाच्या पुढे होते " - पी . सीतारामय्या.


>  टिळक हे मला उत्तुंग हिमालयासारखे वाटले ' - म. गांधी.


>  "धडाडी,  स्वार्थत्याग , कष्टाळूपणा , राजकी मुत्सद्देगिरी व व्यवहारी वृत्ती या सर्वांचा समावेश टिळकांमध्ये होता अरविंद घोष.


>  टिळकांच्या जीवनाचा कालपट 

• जन्म २३ जुलै १८५६ रत्नागिरी , चिखली .

• मूळ नाव - केशव .

• १८७६ - बी . ए .

• १ जानेवारी १८८० - न्यू इंग्लिश स्कूल - टिळक , आगरकर , चिपळूणकर .

• मराठा ( इंग्रजी ) -२ जानेवारी १८८१ संपादक टिळक .

• ४ जानेवारी १८८१ - केसरी ( मराठा ) - संपादक - आगरकर .

• २४ ऑक्टोबर १८८४ - डेक्कन एज्यूकेशन सोसायटी - टिळक , आगरकर .

• २ जानेवारी १८८५-- फर्ग्युसन कॉलेज ( डेक्कन एज्यूकेशन सोसायटीद्वारे ) .

• १८८७ आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिल्याने संपादक - टिळक .

• १८८ ९ - टिळकांचा काँग्रेस प्रवेश ,

• १८ ९ ० - डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचा राजीनामा .

• 1८ ९ ३ - सार्वजनिक गणपती उत्सव ,

• 1८ ९ ५ - शिवजंयती उत्सव .

• ५८९ ७ - नवनियुक्त प्लेग कमिशनर रंडचा खून झाल्यावर टिळकांचे काही जहाल लेख केसरीमध्ये प्रकाशित झाले .

• 6 जुलै - सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

• १३ जुलै - राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे .

• सप्टेंबर १८ ९ ७ - टिळकांना १८ महिन्यांची सक्तमजूरीची शिक्षा

• ६ सप्टेंबर १८ ९ ८ - सुटका

• २४ ऑगस्ट १ ९ ०२ - ताईमहाराजांच्या खटल्यात दोषी ठरून दीड वर्षे सक्तमजूरी व १००० रु . दंडाची शिक्षा .

• १ ९ ०५ - स्वदेशी चळवळ सुरु करुन - स्वराज्य , स्वदेशी ; बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु : सूत्रीचा पुरस्कार केला .

• १ ९ ०८ - खुदीरामच्या बॉम्ब खटल्यावरून केसरीत लेख लिहिले . ' देशाचे दुर्दैव ' व ' हे उपाय टिकावू नाहीत यावरून राजद्रोहाच्या खटला . ६ वर्षे शिक्षा व १००० रु दंड .

• १७ जून १ ९ १४ टिळकांची तुरुंगातून सुटका वाहन

• १ ९ १६ लखनौ काँग्रेस , होमरुल चळवळ .

• १ ९ सप्टेंबर १ ९ १८ विलायतेस रवाना .

• १ ऑगस्ट १ ९ २० मृत्यू .



> ग्रंथसंपदा 

        ( १ ) द ओरायन ( रिसर्चेस इन टू द ॲटिक्कीटीझ ऑफ वेदाज - १८ ९ ४ )
        ( २ ) आर्क्टिक होम इन द वेदाज ( १ ९ ०३ )
        ( 3 ) Haldean & Indian Vedas ( 1915 )
        ( ४ ) श्रीमद्भगवत गीतारहस्य ( १ ९ १३ )



आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.