MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Tuesday, June 2, 2020

महर्षि कर्वे

   
          

                           महर्षि कर्वे 

       " महर्षि अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक शतकाचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत . एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्पकार आहेत . " - प्र . के . अत्रे त्यांच्या कार्याचा प्रारंभ विधवा विवाहापासून झाला तर त्याची परिणती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यात झाली .


> जन्म - १८ एप्रिल १८५८ शेरवली , मुरुड ( जि . रत्नागिरी)


> शिक्षण - प्राथमिक शिक्षण मुरुड या गावी झाले . सहावीची परीक्षा देण्यासाठी कुंभार्ली घाटातून पायी चालत सातारा येथे आले . पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले . १८८१ ला मॅट्रिक पास झाले व १८८४ ला मुंबईच्या विल्यम कॉलेजमधून बी. ए. उर्तीण .


> नोकरी - टिळकांनी फर्ग्युसनमधील आपला राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली . एलफिन्स्टन हायस्कूलमध्येही शिक्षकाची नोकरी केली . रानडे , गोखले , नौरोजी , आगरकर यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा घेतली . डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते आजीव सदस्य होते . ( १ ९ १४ पर्यंत )


> विधवा विवाह
• पंडिता रमाबाई यांच्या ' शारदा सदनमधील ' गोदुबाई या बालविधवेशी विवाह केला . ( १ ९ ८३ ) तिचे नाव आनंदीबाई ठेवले . आश्रमात त्यांना ' बाया ' म्हणत .

• विधवा विवाहाच्या संदर्भात त्यांनी पुरोगामी विचार मांडले होते . ते कृतीत उतरवले त्यावेळी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला .

• विधवा विवाहास चालना मिळावी म्हणून त्यांनी १८ ९ ३ मध्ये विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ / विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापन केली . या संस्थेमार्फत पुनर्विवाहाचे कुटुंब मेळावे भरविण्यास सुरुवात केली .

• पुनर्विवाहाच्या बाबतीत आपली मते लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले .


> अनाथ बालिकाश्रम ( १८ ९९ ) - पुण्याच्या सदाशिव पेठेत सुरु केले व नंतर प्लेगमुळे ही संस्था हिंगणे या ठिकाणी नेली . • यावेळी त्यांना सनातनी लोकांचा विरोध , टीका , अपमान सहन करावा लागला .  परंतु विधवांच्या जगण्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य या आश्रमाने केले .


> महिला विद्यालय ( १ ९ ०७ ) - हिंगणे येथे
• सर्वसामान्य मुलींना शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने .


> निष्काम कर्ममठ ( १ ९ १० )
• ब्रीदवाक्य - " लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन , मन , धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणे . '

• कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केली कारण त्यांना स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करावयाची होती .


> महिला विद्यापीठ ( १ ९ १६ )
• स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे अंत्यत पवित्र देशकार्य , धर्मकार्य आहे , अशी कर्वे यांची श्रद्धा होती . त्यामुळे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे असे त्यांना वाटायचे .

• त्यांनीच सांगितलेली विद्यापीठाची काही वैशिष्ट्ये
( १ ) शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावी .
( २ ) इंग्रजी महत्त्वाची भाषा असल्याने तिचेही अध्यापन विद्यापीठात सुरु ठेवले .
( ३ ) स्त्रियांच्या व्यक्तिविकासास पोषक ठरणारे विषय त्यामध्ये देण्यात येतील जसे गायन , आरोग्य , प्रपंचशास्त्र
( ४ ) स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक व्यक्तिभेदास अनुसरुनच विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी .

• या विद्यापीठातील अभ्यासक्रम - प्रशिक्षण पदवी , गृहविज्ञान पदवी , परिचारिका पदवी

• १ ९ २० ला विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांची देणगी विद्यापीठाला दिल्याने या विद्यापीठाचे नादलांच्या आईच्या नावावरून SNDT करण्यात आले .


> महर्षी कव्यांना प्राप्त झालेले बहुमान -

• १ ९ ५२ - बनारस विद्यापीठाची डी . लिट , पुणे व महिला विद्यापीठाची डी . लिट

• १ ९ ५५ पद्मविभूषण

• १ ९ ५८ - भारतरत्न

• मुंबई विद्यापीठाकडून - LL.D.


> ९ नोव्हेंबर १ ९ ६२ - मृत्यू


> महर्षी कव्यांच्या जीवनाचा कालपट

• जन्म - १८ एप्रिल १८५८

• १८७३ राधाबाईशी विवाह

• १८८१ - मॅट्रिक पास

• १८८४ - मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून बी.ए.

• १८ ९ १ फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून

• १८ ९ २ - डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य

• ३१ डिसेंबर १८ ९ ३ - विधवा विवाहोत्तेजक मंडळी

• १८ ९ ५ - विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी

• १८ ९९ - अनाथ बालिकाश्रम ( सदाशिव पेठेत )

• १ ९ ०७ - महिला विद्यालय ( पुणे येथे )

• १ ९ १० - निष्काम कर्ममठाची स्थापना

• १ ९ ११ - महिला विद्यालय हिंगणे येथे

• १ ९ १६ - महिला विद्यापीठाची स्थापना

• १ ९ ३६ - महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना - ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी

• १ ९ ४४ - समता संघाची स्थापना


> अस्पृश्यता व जातिभेद यांच्या निर्मूलनासाठी

• १ ९ ५२ - बनारस , पुणे व महिला विद्यापीठाची डी . लिट

• १ ९ ५५ पद्मविभूषण

• १ ९ ५८ - भारतरत्न

• नोव्हेंबर १ ९ ६२ - मृत्यू .



आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.