MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Monday, June 8, 2020

प्रबोधनकार ठाकरे


                     प्रबोधनकार ठाकरे 


> मूळ नाव - केशव सीताराम ठाकरे

> जन्म १७ सप्टेंबर १८८५ , पनवेल . त्यांचे मूळ गाव रायगड     जिल्ह्यातील पाली व हिंदूमधील सीकेपी
   ( चंद्रसेन , कायस्थ प्रभू ) या समाजातून .

> प्रबोधनकारांना त्यांचे नाव - त्यांनी सुरु केलेला ' प्रबोधन '     या वर्तमानपत्रामुळे मिळाले .
   •  कार्यकर्ते व समाजसुधारक होते .
   • त्यांचा लढा जातीयवाद , अस्पृश्यता , बालविवाह ,               विधवा  केशवपन व हिंदुधर्मातील अनिष्ट रुढी प्रथा               परंपरेविरुद्ध होता 
   • त्यांनी ' सत्यशोधक चळवळीतही काम केले .

> १ ९ २१ ला स्वाध्याय आश्रम ही सामाजिक संघटना             स्थापन  केली .
   • उद्दिष्ट- स्त्रियांचे सशक्तीकरण व शोषितांच्या स्थितीत             सुधारणा घडवून आणणे .
   • या संघटनेकडून बऱ्याचदा विधवा विवाहांचे आयोजन           करण्यात आले .

> गोव्यातील देवदासीची प्रथा नष्ट होण्यामागे प्रबोधकार व         त्यांच्या स्वाध्याय आश्रमाचा मोलाचा वाटा होता .

> प्रबोधकारांना अन्याय बिलकुलच सहन होत नव्हता .             बऱ्याचदा त्यांची आंदोलने आक्रमक व जहाल असायची .       १ ९ २६ - मुंबई ( दादर ) येथे गणपती उत्सवाच्या काळात     त्यांनी ब्राह्मण आयोजकांना विनंती केली की , दलितांना         आरतीस बोलवण्यात यावे . प्रबोधनकारांची विनंती मान्य       झाली नाही तेव्हा त्यांनी ती मूर्तीच नष्ट करण्याची धमकी       दिली . त्यावेळी एका दलिताच्या हस्ते पूजा करण्याचे मान्य     करण्यात आले .

> स्वतःला कोणत्याही विचारसरणीत अटकवून घेण्याची           त्यांची ईच्छा नव्हती . काँग्रेस व हिंदु महासभा दोघांच्या         विचारसरणीपेक्षा - त्यांनी स्वतःला - " हिंदू मिशनरी               सोसायटीशी ' जोडून घेतले . ज्यानुसार हिंदू समाजाचे           नेतृत्व हे ब्राह्मणेतर वर्गाकडे असावे .

> त्यांच्यासाठी हिंदुत्व - मूल्य जोपासणारे , सर्वसमावेशक         धोरणावर आधारित होते . त्यांची विचारसरणी संकुचित         नव्हती . मुस्लिम , ख्रिश्चन व इतर कोणत्याही धर्माविषयी       त्यांनी अपशब्द काढले नाहीत . याउलट हिंदू धर्मातील           रुढीवादी ब्राह्मण समाज व त्यांच्या भेदभावाच्या धोरणाचा     त्यांनी कडाडून विरोध केला . ब्राह्मणांचे नेतृत्व व संपूर्ण         समाजव्यवस्थेचा त्यांनी स्वतःकडे घेतलेले मक्ता याचा           त्यांनी विरोध केला .
   पत्रकार म्हणून ' प्रबोधन ' पत्रिका हिंदु समाजातील               सामाजिक , राजकीय व मूल्यांमध्ये सुधारणा घडवून             आणण्याचे विचार मांडले .
    • ब्राह्मणेतर चळवळीचे ते मुख्य पत्रक होते .

> आई - वडिलांची विचारसरणी सुद्धा जातीभेदाला विरोध          करणारी , विषमता सहन न करणारी होती त्यांचा वारसा        प्रबोधनकारांमध्ये आपसूकच आला . लहानपणी जातीय        भेदावर आधारित अनेक लहान - मोठया घटना त्यांना            अनुभवयास आल्या . त्यातून त्यांचे विचार विस्तारत गेले .

> वडीलांनी नोकरी गेल्यानंतर लहानपणी अनेक ठिकाणी         त्यांना स्थलांतर करावे लागले होते - बारामती , मध्य प्रांत       कोलकाता येथेही ते राहिले . या काळात अनेक प्रकारची       कामे करावी लागली . रबर टम्प , साईनबोर्ड बनवाणे ,           पेटिंग करणे , रिपेअरिंग करणे याशिवाय प्रामोफोन
   विकणे , पोलिसी काढणे इ , हळहळू लिखाणात जम             बसल्यावर त्याद्वारे उत्पन्नाचा एक मार्ग मोकळा झाला .         यानंतर १० वर्षे PWD पीडब्लूडी मध्ये काम केले त्यावेळी     हेड क्लापदापर्यंत ते पोहोचले ,

> १ ९ १० ला ला झाले . रमा गुले यांच्याशी अलिबाग येथे ,

> प्रबोधनकार व ब्राह्मणेतर चळवळ 

   • १ ९व्या शतकाच्या अखेरीस फुलेंच्या उच्चवर्णिय ब्राह्मण       वर्गाविरोधी सामाजिक चळवळ सुरु झाली होती .                 फुलेंच्या  सत्यशोधक समाजाने सुरु केलेल्या चळवळीने         शाहू महाराजांच्या काळात चांगला जोम धरला .
   • ब्राह्मण - ब्राहाणेतरांच्या संघर्षात - दोन्ही बाजूंनी                 आपल्या  विचारांच्या प्रसारार्थ वृत्तपत्रांचा वापर करण्यास       सुरुवात केली . अशावेळी महाराजांना गैरब्राह्मण , मतांचे       समर्थन करण्यासाठी - उत्कृष्ट बुद्धिवंत लेखकाची गरज         होती , ती गरज प्रबोधनकारांनी पूर्ण केली . पुढे                   प्रबोधनकार गैरब्राह्मण चळवळीतील महत्त्वाचे सदस्य           बनले . त्यांच्या लेखपीने लोकांना विचारप्रवृत्त केले ,   
   • त्याच काळात महाराष्ट्राचा इतिहास नव्याने लिहिणारे
     वि . का . राजवाडे यांच्या ग्रंथांतील मजकुरावरून                 प्रबोधनकारांचा व त्यांचा वाद निर्माण झाला होता .
   • या काळात त्यांनी हे सिद्ध करायचा प्रयत्न केला की             हिंदवी स्वराज्याची स्थापना करतेवेळी अनेक ब्राह्मणेतर         जातीनी ( CKP सारख्या ) महत्त्वाचे योगदान दिले आहे .
   • त्यांच्या प्रभावी लिखाणामुळे शाहू महाराजांनी त्यांना '            कोंदड ' ( Kodund ) उपाधी दिली . शाहू महाराज            त्यांच्या विचारांमुळे फार प्रभावित होत . स्वतःचे                    आत्मचरित्र लिहून देण्यासाठी त्यांनी प्रबोधनकारांना              विनंती केली होती ,

> भाऊराव पाटील प्रबोधनकारांना - मार्गदर्शक समजत
   असत . ते म्हणतात - " रयत शिक्षण संस्था जरी माझी           असली तरी प्रबोधनकारांनी आपली ऊर्जा व जीवन               संस्थेसाठी दिले आहे . ते माझे फक्त गुरुच नाहीत तर             पित्यासमान आहेत . " भाऊराव पाटील व प्रबोधनकार         दोघांनी मिळून अस्पृश्य मुलांसाठी एक वसतिगृह काढले .       दोघांच्या प्रयत्नांची म . गांधींनी स्तुती केली ,

> ' वत्कृत्व शास्त्र ' हे त्यांचे प्रकाशित झालेले प्रथम महत्त्वाचे     पुस्तक , ज्यांचे कौतुक लोकमान्य टिळाकांनी पण केले
   होते . नंतर त्यांनी बरीच नाटके , पुस्तिका व चरित्रे
   लिहिली . त्यांचे आत्मचरित्र ' माझी जीवनगाथा ' सध्या         इतिहासकार व संशोधकांस मार्गदर्शनाची भूमिका
   निभावते .

> त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते -               श्यामची आई , महात्मा फुले , माझी लक्ष्मी इ .

> नवरात्र उत्सव - १ ९ २७ ला खास महाराष्ट्रीयन पद्धतीने         नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली . त्यांनी     संशोधनातून एक गोष्ट सिद्ध केली की , पूर्वी महाराष्ट्रात या     उत्सवाचे आयोजन केली जायचे पण पेशव्यांच्या                  काळापासून ही परंपरा खंडित झाली .

> संयुक्त महाराष्ट्र चळवळीत - त्यांनी महत्त्वाची भूमिका           बजावली , विविध गट पक्ष , व्यक्ती ज्यांच्या विचारसरणी       भिन्न होत्या त्यांना एकाच उद्दिष्टासाठी एकत्र आणण्याचे         महत्त्वाचे काम त्यांनी केले .

> मृत्यू - २० नोव्हेंबर १ ९ ७३

> प्रबोधनकारांचे साहित्य 

   • आत्मचरित्र - माझी जीवनगाथा
   • नाटक।      - खरा ब्राह्मण , संगीत विधीनिषेध , थकलेले                         पोर ,
   • चरित्र        - संत गाडगेबाबा , पंडिता रमाबाई
   • अनुवाद     - हिंदु जनाचा -हास आणि अघःपात
                    - शनिमहात्म्य
                    - शेतकऱ्यांचे स्वराज्य


    आणखी वाचण्यासाठी

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.