प्रबोधनकार ठाकरे
> मूळ नाव - केशव सीताराम ठाकरे
> जन्म १७ सप्टेंबर १८८५ , पनवेल . त्यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पाली व हिंदूमधील सीकेपी
( चंद्रसेन , कायस्थ प्रभू ) या समाजातून .
> प्रबोधनकारांना त्यांचे नाव - त्यांनी सुरु केलेला ' प्रबोधन ' या वर्तमानपत्रामुळे मिळाले .
• कार्यकर्ते व समाजसुधारक होते .
• त्यांचा लढा जातीयवाद , अस्पृश्यता , बालविवाह , विधवा केशवपन व हिंदुधर्मातील अनिष्ट रुढी प्रथा परंपरेविरुद्ध होता
• त्यांनी ' सत्यशोधक चळवळीतही काम केले .
> १ ९ २१ ला स्वाध्याय आश्रम ही सामाजिक संघटना स्थापन केली .
• उद्दिष्ट- स्त्रियांचे सशक्तीकरण व शोषितांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणणे .
• या संघटनेकडून बऱ्याचदा विधवा विवाहांचे आयोजन करण्यात आले .
> गोव्यातील देवदासीची प्रथा नष्ट होण्यामागे प्रबोधकार व त्यांच्या स्वाध्याय आश्रमाचा मोलाचा वाटा होता .
> प्रबोधकारांना अन्याय बिलकुलच सहन होत नव्हता . बऱ्याचदा त्यांची आंदोलने आक्रमक व जहाल असायची . १ ९ २६ - मुंबई ( दादर ) येथे गणपती उत्सवाच्या काळात त्यांनी ब्राह्मण आयोजकांना विनंती केली की , दलितांना आरतीस बोलवण्यात यावे . प्रबोधनकारांची विनंती मान्य झाली नाही तेव्हा त्यांनी ती मूर्तीच नष्ट करण्याची धमकी दिली . त्यावेळी एका दलिताच्या हस्ते पूजा करण्याचे मान्य करण्यात आले .
> स्वतःला कोणत्याही विचारसरणीत अटकवून घेण्याची त्यांची ईच्छा नव्हती . काँग्रेस व हिंदु महासभा दोघांच्या विचारसरणीपेक्षा - त्यांनी स्वतःला - " हिंदू मिशनरी सोसायटीशी ' जोडून घेतले . ज्यानुसार हिंदू समाजाचे नेतृत्व हे ब्राह्मणेतर वर्गाकडे असावे .
> त्यांच्यासाठी हिंदुत्व - मूल्य जोपासणारे , सर्वसमावेशक धोरणावर आधारित होते . त्यांची विचारसरणी संकुचित नव्हती . मुस्लिम , ख्रिश्चन व इतर कोणत्याही धर्माविषयी त्यांनी अपशब्द काढले नाहीत . याउलट हिंदू धर्मातील रुढीवादी ब्राह्मण समाज व त्यांच्या भेदभावाच्या धोरणाचा त्यांनी कडाडून विरोध केला . ब्राह्मणांचे नेतृत्व व संपूर्ण समाजव्यवस्थेचा त्यांनी स्वतःकडे घेतलेले मक्ता याचा त्यांनी विरोध केला .
पत्रकार म्हणून ' प्रबोधन ' पत्रिका हिंदु समाजातील सामाजिक , राजकीय व मूल्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे विचार मांडले .
• ब्राह्मणेतर चळवळीचे ते मुख्य पत्रक होते .
> आई - वडिलांची विचारसरणी सुद्धा जातीभेदाला विरोध करणारी , विषमता सहन न करणारी होती त्यांचा वारसा प्रबोधनकारांमध्ये आपसूकच आला . लहानपणी जातीय भेदावर आधारित अनेक लहान - मोठया घटना त्यांना अनुभवयास आल्या . त्यातून त्यांचे विचार विस्तारत गेले .
> वडीलांनी नोकरी गेल्यानंतर लहानपणी अनेक ठिकाणी त्यांना स्थलांतर करावे लागले होते - बारामती , मध्य प्रांत कोलकाता येथेही ते राहिले . या काळात अनेक प्रकारची कामे करावी लागली . रबर टम्प , साईनबोर्ड बनवाणे , पेटिंग करणे , रिपेअरिंग करणे याशिवाय प्रामोफोन
विकणे , पोलिसी काढणे इ , हळहळू लिखाणात जम बसल्यावर त्याद्वारे उत्पन्नाचा एक मार्ग मोकळा झाला . यानंतर १० वर्षे PWD पीडब्लूडी मध्ये काम केले त्यावेळी हेड क्लापदापर्यंत ते पोहोचले ,
> १ ९ १० ला ला झाले . रमा गुले यांच्याशी अलिबाग येथे ,
> प्रबोधनकार व ब्राह्मणेतर चळवळ
• १ ९व्या शतकाच्या अखेरीस फुलेंच्या उच्चवर्णिय ब्राह्मण वर्गाविरोधी सामाजिक चळवळ सुरु झाली होती . फुलेंच्या सत्यशोधक समाजाने सुरु केलेल्या चळवळीने शाहू महाराजांच्या काळात चांगला जोम धरला .• ब्राह्मण - ब्राहाणेतरांच्या संघर्षात - दोन्ही बाजूंनी आपल्या विचारांच्या प्रसारार्थ वृत्तपत्रांचा वापर करण्यास सुरुवात केली . अशावेळी महाराजांना गैरब्राह्मण , मतांचे समर्थन करण्यासाठी - उत्कृष्ट बुद्धिवंत लेखकाची गरज होती , ती गरज प्रबोधनकारांनी पूर्ण केली . पुढे प्रबोधनकार गैरब्राह्मण चळवळीतील महत्त्वाचे सदस्य बनले . त्यांच्या लेखपीने लोकांना विचारप्रवृत्त केले ,
• त्याच काळात महाराष्ट्राचा इतिहास नव्याने लिहिणारे
वि . का . राजवाडे यांच्या ग्रंथांतील मजकुरावरून प्रबोधनकारांचा व त्यांचा वाद निर्माण झाला होता .
• या काळात त्यांनी हे सिद्ध करायचा प्रयत्न केला की हिंदवी स्वराज्याची स्थापना करतेवेळी अनेक ब्राह्मणेतर जातीनी ( CKP सारख्या ) महत्त्वाचे योगदान दिले आहे .
• त्यांच्या प्रभावी लिखाणामुळे शाहू महाराजांनी त्यांना ' कोंदड ' ( Kodund ) उपाधी दिली . शाहू महाराज त्यांच्या विचारांमुळे फार प्रभावित होत . स्वतःचे आत्मचरित्र लिहून देण्यासाठी त्यांनी प्रबोधनकारांना विनंती केली होती ,
> भाऊराव पाटील प्रबोधनकारांना - मार्गदर्शक समजत
असत . ते म्हणतात - " रयत शिक्षण संस्था जरी माझी असली तरी प्रबोधनकारांनी आपली ऊर्जा व जीवन संस्थेसाठी दिले आहे . ते माझे फक्त गुरुच नाहीत तर पित्यासमान आहेत . " भाऊराव पाटील व प्रबोधनकार दोघांनी मिळून अस्पृश्य मुलांसाठी एक वसतिगृह काढले . दोघांच्या प्रयत्नांची म . गांधींनी स्तुती केली ,
> ' वत्कृत्व शास्त्र ' हे त्यांचे प्रकाशित झालेले प्रथम महत्त्वाचे पुस्तक , ज्यांचे कौतुक लोकमान्य टिळाकांनी पण केले
होते . नंतर त्यांनी बरीच नाटके , पुस्तिका व चरित्रे
लिहिली . त्यांचे आत्मचरित्र ' माझी जीवनगाथा ' सध्या इतिहासकार व संशोधकांस मार्गदर्शनाची भूमिका
निभावते .
> त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते - श्यामची आई , महात्मा फुले , माझी लक्ष्मी इ .
> नवरात्र उत्सव - १ ९ २७ ला खास महाराष्ट्रीयन पद्धतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली . त्यांनी संशोधनातून एक गोष्ट सिद्ध केली की , पूर्वी महाराष्ट्रात या उत्सवाचे आयोजन केली जायचे पण पेशव्यांच्या काळापासून ही परंपरा खंडित झाली .
> संयुक्त महाराष्ट्र चळवळीत - त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली , विविध गट पक्ष , व्यक्ती ज्यांच्या विचारसरणी भिन्न होत्या त्यांना एकाच उद्दिष्टासाठी एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले .
> मृत्यू - २० नोव्हेंबर १ ९ ७३
> प्रबोधनकारांचे साहित्य
• आत्मचरित्र - माझी जीवनगाथा• नाटक। - खरा ब्राह्मण , संगीत विधीनिषेध , थकलेले पोर ,
• चरित्र - संत गाडगेबाबा , पंडिता रमाबाई
• अनुवाद - हिंदु जनाचा -हास आणि अघःपात
- शनिमहात्म्य
- शेतकऱ्यांचे स्वराज्य
आणखी वाचण्यासाठी
No comments:
Post a Comment
Please do not enter and spam link in the comment box.